ग्लोबल

युक्रेन ते भारत विमान भाड्यावरील टीकेनंतर महत्त्वाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युक्रेन-रशियामध्ये सध्या युद्ध सुरु असून चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. खासकरुन भारतातून युक्रेनमध्ये शिकायला गेलेले विद्यार्थी अथवा भारतीय नागरिकांच्या जीविताची काळजी वाढली त्यांना भारतात परत आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून भारतामध्ये नागरिकांना परत आणण्यासाठी इतर काही मार्गांचा विचार केला जातो आहे. दुसरीकडे, युद्धासारख्या संकटाच्या परिस्थितीमध्ये विमान प्रवासाची किंमत ही नेहमीपेक्षा तिप्पट किंमतीने वाढल्याचं दिसून येतंय. यावर अनेक विद्यार्थी आणि नागरिकांनी चिंताही व्यक्त केली आहे. तसेच टीकाही करण्यात आली. त्यानंतर आता सरकारकडून मोठा एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

वाढत्या तक्रारी लक्षात घेता आता युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी भारत सरकार काही विमानांची व्यवस्था करणार आहे. या विमान प्रवासाचा खर्च सरकार उचलणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थी घरी परतू शकले नाहीयेत. आमच्याकडे नोंदणी केलेल्यांपैकी अनेकांनी युक्रेन ते भारत हा प्रवास करण्यास सक्षम नसल्याचं म्हटलंय. कारण या प्रवासाचे भाडे नेहमीपेक्षा कित्येक पटीने वाढवण्यात आलंय. सामान्यत: विमान भाडे प्रति प्रवासी सुमारे 25,000 ते 30,000 रुपये आहे, परंतु ते 1 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, अशी माहिती तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT