Pakistan Economic Crisis esakal
ग्लोबल

Pakistan Economic Crisis : पाणबुड्या आहेत की खेळण्या? पाकिस्तानने ग्रीसपुढे हात पसरले; पण भारतामुळे...

संतोष कानडे

Pakistan Economic Crisis : सध्या पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. देशात वरचेवर स्थिती बिकट होत चालली आहे. पाकिस्तानमधली परकीय चलनाची गंगाजळी संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून देशात दिवसेंदिवस महागाई वाढतांना दिसतेय.

दरम्यान, पाकिस्तानच्या आर्थिक संकटाचा परिणाम त्यांच्या पाणबुड्यांर झाला आहे. पाणबुड्यांचे वरचेवर सांगाडे होतांना दिसून येत आहेत. पाकिस्तानच्या या अवस्थेचा नौदलाला फटका बसला आहे. चालू असलेल्या पानबुड्यांसाठी बॅटरी नाहीयेत आणि निर्माणाधीन पानबुड्यांसाठी इंजिनं नाहीत.

पाकिस्तानकडे असलेल्या पाच पानबुड्यांमध्ये बॅटरींची समस्या आहे. पाण्याखाली ऑपरेट करण्यासाठी पाणबुडीला वीजेची आवश्यकता असते. परंतु आर्थिक संकटामुळे पाकिस्तानकडे बॅटरींची समस्या आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आर्थिक संकटामुळे पाकिस्तानने ग्रीसकडे मदत मागितली होती. बॅटरींसाठी पाकिस्तानने ग्रीसकडे हास पसरले होते. मात्र ग्रीसने त्यांची मागणी फेटाळून लावल्याची सूत्रांची माहिती आहे. भारत-ग्रीस संबंधांमुळेच पाकिस्तानला ग्रीसने धुडकावल्याचं सांगितलं जात आहे.

मागच्याच वर्षी भारताने ग्रीसला पाकिस्तानबाबत विनंती केली होती. सुरक्षेसंबंधीच्या उपकरणांमध्ये पाकिस्तानला ग्रीसने मदत करु नये, अशी भारताची भूमिका होती. त्यानंतर ग्रीसने पाकिस्तानला मदत देण्याला नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT