india-china 
ग्लोबल

नेहरुंना लिहिलेल्या पत्राच्या आधारावर चीनचा लडाखवर दावा; भारताने केला अमान्य

पीटीआय

नवी दिल्ली - प्रत्यक्ष ताबा रेषेबाबत १९५९ या सालात असलेल्या मान्येतेशी चीन बांधिल असल्याचे चीन सरकारने केलेले विधान भारताने काल साफ फेटाळून लावले. तात्पुरत्या स्वरुपात असलेल्या सीमारेषेबाबत एकतर्फी आणि वादग्रस्त दावे करणे चीनने थांबवावे, असा इशाराही भारताने दिला आहे. 

भारत आणि चीनदरम्यान १९५९ मध्ये निश्‍चित झालेल्या सीमारेषेशी चीन बांधिल असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने विधान केले होते. या विधानाला भारताने तीव्र विरोध केला. ‘१९५९ मध्ये एकतर्फी ठरविली गेलेली तथाकथित सीमारेषा भारताला प्रथमपासूनच मान्य नाही. ही भारताची भूमिका चीनसह सर्व जगाला माहिती आहे,’असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१९५९ मध्ये चीनचे तत्कालीन पंतप्रधान झोऊ एनलाय यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र पाठवत प्रत्यक्ष ताबा रेषेबाबत प्रस्ताव दिला होता. याच सीमारेषेला बांधील असल्याचे चीनचे म्हणणे आहे. मात्र, श्रीवास्तव यांनी भारत आणि चीनमध्ये १९९३, १९९६ आणि २००५ मध्ये झालेल्या करारांचा आणि विविध वेळी झालेल्या चर्चांचा दाखला देताना सीमा रेषा निश्‍चितीबाबत सर्व सहमतीने निर्णय घेण्याचे मान्य झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे केवळ एकच ताबा रेषा असल्याचा चीनचा दावा दोन देशांदरम्यान झालेल्या करारांना विरोधाभासी असल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला. सीमेवर शांतता पाळत असल्याचा चीनचा दावाही भारताने फेटाळून लावला. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT