Indias decision to discontinue the discussion is Furoriness Says Imran Khan 
ग्लोबल

चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय "उर्मटपणा'चा- इम्रान खान

वृत्तसंस्था

इस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमधील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय उर्मटपणाचा असल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केली आहे. भारताकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे आपण निराश झालो असल्याचेही खान यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये होणार असलेली चर्चा रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. जम्मू आणि काश्‍मीरमध्ये तीन पोलिसांची झालेली हत्या आणि ठार करण्यात आलेला काश्‍मिरी दहशतवादी बुऱ्हाण वणीच्या नावाने पाकिस्तानने काढलेल्या टपाल तिकिटाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवरील चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. या निर्णयावर खान यांनी आज टीका केली.

भारताचा प्रतिसाद उर्मटपणाचा आणि नकारात्मक आहे. मोठी दृष्टी नसलेल्या व्यक्ती मोठ्या पदांवर असल्याचे मी आयुष्यभर पाहात आलो आहे, असे खान यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaista Tadvi Success Story : अठरा विश्व दारिद्र्य अन् उपासमारीची वेळ, तरीही जिद्द सोडली नाही! वीटभट्टी कामगाराच्या लेकीनं पहिल्याच प्रयत्नात पोलिस होऊन दाखवलं

गुरुजी हे वागणं बरं नव्हं! काजूच्या बागेत महिलेवर शिक्षकाचा अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Latest Marathi News Live Update : कामाचे वातावरण 'विषारी' झाले तरी कर्मचारी नोटीस कालावधी पूर्ण करतात, भारद्वाज यांचे राघव चढ्ढा यांना प्रत्युत्तर

Sagareshwar Wildlife Sanctuary : सांगलीच्या 'सागरेश्वर'मध्ये वन्यजीवांचा मुक्त संचार! उन्हाळ्यातही हरणांचे कळप पाहायचेत? मग, हीच आहे सुवर्णसंधी

Maharashtra HSC Result 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 'या' दिवशी निकाल लागण्याची शक्यता, अपडेट्स समोर

SCROLL FOR NEXT