Indias decision to discontinue the discussion is Furoriness Says Imran Khan 
ग्लोबल

चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय "उर्मटपणा'चा- इम्रान खान

वृत्तसंस्था

इस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमधील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय उर्मटपणाचा असल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केली आहे. भारताकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे आपण निराश झालो असल्याचेही खान यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये होणार असलेली चर्चा रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. जम्मू आणि काश्‍मीरमध्ये तीन पोलिसांची झालेली हत्या आणि ठार करण्यात आलेला काश्‍मिरी दहशतवादी बुऱ्हाण वणीच्या नावाने पाकिस्तानने काढलेल्या टपाल तिकिटाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवरील चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. या निर्णयावर खान यांनी आज टीका केली.

भारताचा प्रतिसाद उर्मटपणाचा आणि नकारात्मक आहे. मोठी दृष्टी नसलेल्या व्यक्ती मोठ्या पदांवर असल्याचे मी आयुष्यभर पाहात आलो आहे, असे खान यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: राजकारणात मोठा ट्विस्ट! काकांनी नाकारलं; पवार–शिंदे युतीमुळे नवं समीकरण तयार होणार? पुण्यात पडद्यामागे घडामोडी

Smith Surpasses Dravid: ऑस्ट्रेलिया 'बॉक्सिंग डे' टेस्ट हरले, पण कर्णधार स्मिथने द्रविड-कोहलीला मागे टाकत रचले मोठे विक्रम

Aaditya Thackeray : "एका झाडालाही हात लावू देणार नाही"; तपोवनातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरे आक्रमक!

‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ चित्रपट निराशाजनक, विस्कळित कथेमुळे प्रेमाची जादू हरवली

Nagpur Municipal Election : ...तर एकत्र लढणार ‘महाविकास आघाडी’; काँग्रेसकडून ३२ जागा सोडण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT