philippines 
ग्लोबल

फिलिपीन्सच्या समुद्रात बोट उलटून चौघांचा मृत्यू 

वृत्तसंस्था

मनीला : फिलिपीन्सच्या समुद्रात बोट उलटून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. त्या बोटीत 251 लोक असल्याची माहिती मिळत आहे. यात अनेकांना जलसमाधी मिळाली. ही घटना मनीलापासून सुमारे 70 किलोमीटर पूर्व दिशेला असलेल्या रिअल शहराजवळच्या समुद्रात घडली. 

या दुर्घटनेची माहिती मिळताच बोटीतील नागरिकांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाच्या चार बोटी दाखल झाल्या. या बोटीत 251 लोक असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील 166 जणांना वाचवण्यात यश आले असून, चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यातील 88 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील लोकांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत करण्यात येणार आहे.

याबाबत तटरक्षक दलाचे प्रवक्ते अर्मांड बलिलो म्हणाले, ''251 लोकांना घेऊन जाणारी बोट अचानक फिलिपीन्सच्या समुद्रात बुडाली. यादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला असून, 166 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, अद्याप 88 जण बेपत्ता झाले आहेत''.    

दरम्यान, ही दुर्घटना खराब हवामानामुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातील नागरिकांनी आजू-बाजूच्या बोटींचा सहारा घेत पाण्यातून बाहेर येत स्वत: चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

"हम मजदूर आदमी हैं", मोहम्मद शमीने पुन्हा निवड समिती प्रमुख अजित आगरकरला टोमणा हाणला, आता हा वाद आणखी पेटणार?

Paithan Pachod Education News: पाचोडच्या शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

Latest Marathi News Live Update: पुण्याच्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात

'आता एवढंच राहिलं होतं!' कॉमेडियन समय रैनानं उडवडी बिग बी अमिताभ बच्चन यांची खिल्ली, म्हणाला...'पोलिओच्या जाहिराती केल्या पण...'

SCROLL FOR NEXT