nationwide curfew was lifted for 12 hours Movements of new government Prime Minister Wickremesinghe sakal
ग्लोबल

पंतप्रधान विक्रमसिंघेंकडून नवीन सरकारच्या हालचाली

श्रीलंकेत शनिवारी बारा तासांसाठी देशव्यापी संचारबंदी हटविण्यात आली. तसेच या कालावधीदरम्यान कडक निर्बध शिथिल केले.

सकाळ वृत्तसेवा

कोलंबो : श्रीलंकेत शनिवारी बारा तासांसाठी देशव्यापी संचारबंदी हटविण्यात आली. तसेच या कालावधीदरम्यान कडक निर्बध शिथिल केले. दुसरीकडे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यानुसार राजकीय स्थिरता येईल आणि आर्थिक संकटातून बाहेर काढता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी मागे घेण्यात आली होती.

नऊ मे रोजी लागू केलेली संचारबंदी १२ आणि १३ मे रोजी काही काळासाठी मागे घेतली होती. संचारबंदी शिथिल केल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली. महिंदा राजपक्ष यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यापूर्वी काही तास अगोदर सरकार समर्थकांनी विरोधकांवर हल्ले केले होते. त्यामुळे अध्यक्ष राजपक्ष यांनी लष्कराला पाचारण केले व संचारबंदी लागू केली. संचारबंदीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे विक्रमसिंघे यांनी आज संचारबंदी शिथिल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT