ग्लोबल

पामेला अँडरसनचे पंतप्रधान मोदींना पत्र 

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : हॉलिवूडची अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय पातळीवर शाकाहार आणि पर्यावरणसंवर्धनाचा पुरस्कार करणाऱ्या पामेला अँडरसनने आता थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित सरकारच्या कार्यक्रमांमधून शाकाहाराचा प्रसार केला जावा, अशी मागणी केली आहे.

पामेलाने या पत्रामध्ये वैश्‍विक तापमानवाढ आणि वाढत्या प्रदूषणाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. जगभरातील संशोधकांनी वातावरणातील बदलांना याआधीच आणीबाणी म्हणून घोषित केले असून, त्यावर तातडीने उपाययोजना आखायला हव्यात असे तिने म्हटले आहे. दुग्धोत्पादन, मांस आणि अंडी यासाठी पशुपालन केल्याने मोठ्या प्रमाणावर हरितगृह वायूंची निर्मिती होते. या सगळ्या घटकांचा हरितगृह वायू उत्सर्जनातील वाटा एक पचमांश एवढा असल्याचे तिने म्हटले आहे.

मांस आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या यांचा प्रदूषणातील वाटा मोठा आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही तापमानवाढीचा सामना करण्यासाठी शाकाहाराकडे वळणे गरजेचे असल्याचे म्हटले असून, हा आता पर्याय राहिला नसून गरज बनली असल्याचेही पामेलाने तिच्या पत्रात नमूद केले आहे.

दुग्धजन्य पदार्थ हद्दपार व्हावेत

सरकारचे विविध उपक्रम आणि बैठकांमधून दुग्धजन्य पदार्थ आणि मांसापासून तयार करण्यात आलेले घटक हद्दपार केले जावेत, असे तिने म्हटले आहे. दुग्धजन्य उत्पादनांना सोयाबीनपासून तयार करण्यात आलेले पदार्थ एक उत्तम पर्याय ठरू शकतात, असा विश्‍वासही तिने व्यक्त केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT