ग्लोबल

Article 370 : पुलवामासारखा आणखी एक हल्ला घडेल : इम्रान खान

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : "काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम हटवल्यामुळे आणखी एक पुलवामा घडेल,' अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी केली. 

जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानमधील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानी संसदेचे संयुक्त अधिवेशन आज झाले. त्यात इम्रान खान यांनी हे विधान केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काही संबंध नव्हता, असा दावासुद्धा इम्रान यांनी या वेळी केला. "मोदी सरकारचा हा निर्णय काश्‍मीरच्या जनतेचा आवाज चिरडू शकणार नाही. भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या संस्थापकांच्या वर्णद्वेषाच्या विचारसरणीवर आधारित कार्य करणारा पक्ष आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून मुसलमान हे दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत,'' असा दावा करीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (आरएसएस) लक्ष केले. 

"370 वे कलम रद्द करण्याच्या मोदी सरकारचा निर्णय मोहम्मद अली जीना यांच्या द्विराष्ट्र सिद्धांताला पुष्टी देणाराच आहे. भारत हा केवळ हिंदूचाच असावा, अशी "आरएसएस'ची इच्छा आहे आणि कोणत्याही मुस्लिमाला दुय्यम नागरिकाची वागणूक देणार, हे जीना यांना आधीच माहीत होते,'' असेही इम्रान खान म्हणाले. हिंदूंना पहिले प्राधान्य देण्याच्या जातीयवादी विचारातून भारताची निर्मिती झाली आहे, तर पाकिस्तानात सर्व नागरिकांना समानतेची वागणूक दिली जाते, असा दावा त्यांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Bank Job : मोठा निर्णय! तुमच्या जिल्ह्यातल्या बँकेत तुम्हाला मिळणार नोकरी! ७० टक्के जागा रहिवाशांसाठी राखीव, कसा करायचा अर्ज? पाहा

KYC Problem: केवायसी करायला, डोंगरावर चला! मोबाइल नेटवर्क शोधण्यासाठी कळंकीतील नागरिकांची धावपळ

Latest Marathi News Live Update : मुस्लिम दुबार मतदारांवर ठाकरेंचं पांघरून - आमदार आशिष शेलार

SCROLL FOR NEXT