Kanchana Wijesekera Sakal
ग्लोबल

श्रीलंकेकडून आभार; भारत हा एकमेव देश आहे ज्याने...

श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे आणिबाणी लागू करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : श्रीलंका आर्थिक संकटात सापडल्यामुळे तेथे आणिबाणी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता श्रीलंका या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असून इंधनासाठी श्रीलंकेने अनेक देशांना मदत मागितली होती पण फक्त भारताने त्यांना मदत केल्यामुळे लंकेतील उर्जामंत्र्यांनी भारताचे आभार मानले आहेत.

(SriLanka Crisis)

श्रीलंकेचे ऊर्जामंत्री कांचना विजेसेकेरा यांनी शनिवारी सांगितले की, श्रीलंका सरकारने अनेक देशांना इंधनासाठी मदतीचे अवाहन केले होते कारण श्रीलंका सध्या राजकीय अशांतता आणि आर्थिक संकटामुळे अडचणीत आहे. "भारत हा एकमेव देश आहे ज्याने आतापर्यंत श्रीलंकेला इंधनासारख्या अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट लाइन दिली आहे." असं म्हणत त्यांनी भारताचे आभार मानले आहे.

दरम्यान, जगातील सर्वांत मोठा इंधन उत्पादक आणि निर्यातदार देश असलेल्या रशियाकडे सुद्धा आम्ही मदतीसाठी मागणी केली आहे. आमच्या गरजा आम्ही त्यांना सांगितल्या असून त्यांनीही मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यांच्यासोबत बैठका चालू असून ते कशा प्रकारे मदत करतील त्याकडेच आमचे लक्ष आहे असं श्रीलंकेचे उर्जामंत्री कांचना विजेसेकेरा यांनी सांगितलं. दरम्यान भारताने श्रीलंकेला दिलेल्या क्रेडेट लाईन मुळे त्यांनी भारताचे आभार मानले आहेत.

आर्थिक दिवाळखोरीमुळे संकटात सापडलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपतींनी देशातून पलायन केले असून विक्रमसिंघे यांनी प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे सध्या श्रीलंका या संकटातून सावरण्याच्या प्रयत्नात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT