Radcliffe Line History eSakal
ग्लोबल

Radcliffe Line History : हिंदू लोकसंख्या जास्त असूनही लाहोर शहर पाकिस्तानला का देण्यात आलं? जाणून घ्या सविस्तर

India-Pakistan Partition : भारताची लोकसंख्या पाहता भारताचा कोणता भाग भारतात ठेवायचा आणि कोणता पाकिस्तानला द्यायचा हे ठरवणे कठीण होते.

सकाळ डिजिटल टीम

15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला असला तरी त्यापूर्वीच भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीची तयारी सुरू झाली होती. 3 ऑगस्ट 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी स्वातंत्र्याची योजना मांडताना स्पष्टपणे सांगितले होते की, स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे दोन तुकडे केले जातील. जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांनीही लॉर्ड माउंटबॅटनची योजना मान्य केली होती, पण फाळणी करणे सोपे नव्हते. भारताची लोकसंख्या पाहता भारताचा कोणता भाग भारतात ठेवायचा आणि कोणता पाकिस्तानला द्यायचा हे ठरवणे कठीण होते.

बराच विचार केल्यानंतर धर्माच्या आधारे फाळणीचा निर्णय घेतला जाईल असे ठरले. तथापि, हे सुद्धा सोपे नव्हते कारण अशी अनेक क्षेत्रे होती जिथे हिंदू-मुस्लिम लोकसंख्या जवळपास समान होती. ब्रिटिश सरकारने त्याची जबाबदारी सिरिल रॅडक्लिफ यांच्याकडे सोपवली. विशेष म्हणजे सिरिल रॅडक्लिफ यापूर्वी कधीही भारतात आले नव्हते किंवा त्यांना भारतातील विविध लोकसंख्येची माहितीही नव्हती.

सिरिल रॅडक्लिफ कोण होते?

ब्रिटीश सरकारचा असा विश्वास होता की रॅडक्लिफ भारतात कधीच आले नाहीत त्यामुळे भारत-पाकिस्तानच्या फाळणीसाठी ते योग्य व्यक्ती ठरतील. या कामासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांनी त्यांची निवड केली होती. रॅडक्लिफ हे पेशाने वकील होते. ते वेल्स, यूकेचा रहिवासी होते आणि त्यांचे वडील आर्मी कॅप्टन होते.

त्यांनी ब्रिटनमधील हॅले बेरी येथे शिक्षण घेतलं आणि नंतर ऑक्सफर्डमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वकील म्हणून काम सुरू केलं. अनेक मोठे खटले लढल्यामुळे ते ब्रिटनमध्ये लोकप्रिय झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ते माहिती मंत्रालयात रुजू झाले आणि 1941 मध्ये ते महासंचालक बनले. 1945 मध्ये त्यांनी पुन्हा कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली.

विभाजन रेषा कशी काढली गेली?

भारतीय स्वातंत्र्य कायदा संमत झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीची रेषा आखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांना दोन सीमा आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले. बंगाल आणि पंजाबचे. दोन हिंदू आणि दोन मुस्लिम वकीलही मदतीसाठी देण्यात आले. 8 जुलै 1947 रोजी ते भारतात पोहोचले आणि 5 आठवड्यांच्या आत विभाजनाची रेषा काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

लोकसंख्येच्या दृष्टीने बंगाल आणि पंजाबचे विभाजन करणे सोपे नव्हते. दोन्ही ठिकाणी हिंदू-मुस्लिम लोकसंख्या समान होती. सर्व आव्हानांशी लढा देत, रॅडक्लिफने 12 ऑगस्ट 1947 रोजी त्यांचे काम पूर्ण केले आणि 17 ऑगस्ट 1947 रोजी ही विभाजन रेषा अधिकृतपणे सार्वजनिक करण्यात आली. याला रॅडक्लिफ लाइन असे म्हणतात.

हिंदू-मुस्लिम लोकसंख्येमध्ये जास्त हिंदू लोकसंख्या असणारे लाहोर कोणाला द्यावे यावर खूप चर्चा झाली. रॅडक्लिफने एका मुलाखतीत सांगितले होते की, फाळणीच्या वेळी त्यांनी लाहोर भारताला दिले होते. पण फाळणीला अंतिम रूप देताना असं दिसून आलं की पाकिस्तानच्या बाजूने कोणतंही मोठ शहर नव्हतं. त्यामुळे लाहोर पाकिस्तानमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सीमा निश्चित झाल्यानंतर स्थलांतराला सुरुवात झाली. करोडो लोक भारतातून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून भारतात गेले. फाळणीनंतर रॅडक्लिफ ब्रिटनला परतले आणि पुन्हा भारतात आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BEST Election Results : बेस्ट पतपेढी निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव, मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे बंधुंना मोठा धक्का

Mumbai Rain Update: मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार, लोकल सेवेचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, चाकरमान्यांचे हाल

Shivaji Maharaj : काय होता शिवरायांचा संतुलित आहार? युद्धासाठी नेहमी तंदुरुस्त राहण्यामागचं खरं रहस्य! आजच्या पिढीसाठी प्रेरणा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला झटपट बनवा चवदार ज्वारीची उकडपेंडी, सोपी आहे रेसिपी

MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'

SCROLL FOR NEXT