ग्लोबल

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लखवीला १५ वर्षांची शिक्षा 

वृत्तसंस्था

लाहोर - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘लष्करे तैयबा’ (एलईटी) या संघटनेचा प्रमुख झकीउर रेहमान लखवी (वय ६१) याला पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. तसेच दंडही ठोठावण्यात आला. 

दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरविल्याच्या आरोपावरून लखवीला ही शिक्षा दिली आहे. संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केलेला लखवी मुंबई हल्ल्याच्या प्रकरणात २०१५ पासून जामिनावर बाहेर आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील दहशतवादीविरोधी विभागाने त्याला गेल्या शनिवारी (ता. २) अटक केली होती. दहशतवादविरोधी कायदा १९९७ मधील विविध कलमांखाली त्यावर गुन्हे दाखल करून त्याला१५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने दिली. न्यायाधीश इजाझ अहमद बटार यांनी लखवीला तीन वेगवेगळ्या प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला. 

पाकिस्तानचे नाटक 
‘फायनान्शियल ॲक्शन टॉस्क फोर्स’ (एफएटीएफ)ची बैठक लवकरच होणार आहे. पाकिस्तान सध्या ‘एफएटीएफ’च्या ग्रे यादीत आहे. यंदाही या गटातच पाकिस्तानचा समावेश करण्याचा विचार सुरू असून हे टाळण्यासाठी पाकिस्तानने लखवीला शिक्षा दिल्‍याची चर्चा आहे. पाकिस्तानच्या या नाटकावर भारतीय अधिकाऱ्यांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. ‘एफएटीएफ’च्या बैठकीआधी प्रमुख दहशतवाद्याला अटक करण्याचे पाकिस्तानचे हे नाटक सर्वांना माहीत आहे. याआधी २०१९ मध्ये या बैठकीच्या आधी पाकिस्तानने लष्करे तैयबाचा संस्थापक हाफिज सईद याला अटक केली होती. त्या वेळी ‘एफएटीएफ’कडून पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचा विचार सुरू होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT