Sadguru 
health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : एक राजीखुशी व्यक्ती बनणे

सद्‌गुरू

गोष्टी आणि माणसं कशी काबीज करावी याचं ज्ञान समाज, माणसं आणि शिक्षणातून मिळते. भौतिक गोष्टी काही प्रमाणात काबीज केल्या जाऊ शकतात. मात्र, तुम्हाला वैश्‍विक ऐक्य अनुभवायचं असल्यास शरण जाण्यावाचून पर्याय नाही. तार्किक मनाला शरण जाणं लज्जास्पद गोष्ट वाटते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शरण जाणं ही गोष्ट लोकांना करायची नाहीये, कारण शरण गेल्यानं तुमच्या ‘मीपणाचा’ अंत होतो. स्वतःला वेगवेगळ्या स्तरांवर हरवून जाण्याच्या भीतीपोटी वर्चस्व गाजवण्याची गरज निर्माण होते. भीती कशी हाताळावी हे माहिती नसल्यानं तुम्हाला गोष्टी आणि लोकांवर वर्चस्व गाजवायचं आहे.

तुम्हाला अधिकाधिक गोष्टी संग्रहित करायच्या आहेत. त्यातून तुम्ही स्वतःला पूर्ण करायचा प्रयत्न करता. ही अपुरेपणाची भावना तुमच्यात बळावली आहे, ती तुम्ही त्याप्रमाणं घडवला गेला आहात म्हणून नाही, तर तुम्ही स्वतःची ओळख अगणित लहानसहान गोष्टींशी जोडली आहे. तुम्ही विश्वाचा अनंत पसारा पाहता, तुम्हाला अतिशय लहान आणि हरवल्यासारखं वाटतं. तुमची मूलभूत ओळख धरतीवर चालणाऱ्या फक्त हाडामांसाच्या गोळ्यात रुजलेली आणि मर्यादित आहे, तेव्हा स्वाभाविकपणे तुम्हाला अपूर्ण वाटेल. प्रत्येक क्षणी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. लोकांनी तुमची वाहवा केली पाहिजे, त्यांनी तुम्हाला, तुम्ही किती खास आहात हे सांगावं लागतं, त्यांनी सतत तुम्हाला उत्तेजित करावं लागतं, नाहीतर तुम्हाला हरवल्यासारखं वाटतं.

राजीखुशी व्यक्ती बनणं म्हणजे सीमित गोष्टींच्या ओळखीत स्वतःचं अस्तित्व जखडून ठेवायचं नाही. मग हे कसं करावं? या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठीच लोकांनी ईश्‍वराची कल्पना मांडायला सुरुवात केली. म्हणजे लहानसहान गोष्टींशी ओळखी टाकून द्या आणि तुम्हाला दिसत नाही त्याच्याशी ओळख निर्माण करा. लोकांनी आता देवालाही त्यांच्याच प्रतिकृतीत सीमित करून ठेवलंय आणि आता त्याच्याशी त्यांची ओळख बांधत आहेत. दुर्दैवानं एका व्यक्तीचा देव आणि दुसऱ्या व्यक्तीचा देव आपसात भांडत आहेत, एकमेकांशी युद्धं करत आहेत. 

माणसांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट, परंपरा, प्रक्रिया यांच्यात कालानुरूप; वेळोवेळी सुधारणा आणि त्या वर्धित केल्या पाहिजेत कारण कालांतराने त्या भ्रष्ट होतात. लोक या गोष्टींच्या मागे काय आहे, हे पाहायला लागल्यावर त्या गोष्टी कार्य करू शकत नाहीत. नवीन गोष्टी निर्माण कराव्या लागतात कारण जुन्या गोष्टी कालबाह्य होतात, त्यांचं महत्त्व कमी होत जातं. गोष्टी किती कार्यक्षमपणे कार्य करतात तेच महत्त्वाचं आहे. राजीखुशी होण्याचा प्रयत्न करू नका, ज्या गोष्टींना तुम्ही ‘मी’ म्हणून समजता, ते थांबवा. बहुतेक लोक अशा ओळखींशिवाय असू शकत नाहीत. त्यांचं मन दिसेल, भासेल त्या प्रत्येक गोष्टीशी ओळख निर्माण करतच असतं. त्यामुळे ‘मी’पणा अधिक बळकट करणाऱ्या नव्हे, तर तुमचा ‘मी’पणा मोडून पाडतात त्यांच्याशी ओळख बांधणे उत्तम. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT