Drinking coconut water every day is beneficial if you want to stay healthy 
health-fitness-wellness

आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर दररोज नारळपाणी प्याच

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जो तो नेहमीच प्रयत्नशील असतोच. त्यासाठी अनेकजण आपआपल्या परीने काळजी घेतो. आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टर नेहमीच नारळ पाणी प्यायला सांगतात. नारळ पाणी पिताना खूप चवदार लागते पण तुम्हाला नारळाच्या पाण्याचे फायदे काय आहेत ते माहित आहे का? चला तर मग ते जाणून घेऊयात.

नारळ पाणी हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, त्यात  विटामिन्स, मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट असतात. तसेच यामध्ये कॅलरिज आणि फॅट हि कमी असतात. भारतामध्ये नारळ पाणी खूप लोकप्रिय आहे. नारळ पाण्याचे रोज सेवन केल्यास ते वजन कमी करण्यास मदत करते. तरीही आपण डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे त्याचे सेवन करा. 

नारळ पाणी पिण्याचे फायदे 

१) नारळ पाण्याचे सेवन हे लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये एंटी-ऑक्सीडेंट गुण असतात, जे यकृतातील अनेक प्रकारच्या विषाक्त पदार्थोंच्या क्रिया कमी करते. नारळाचे पाणी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. 

२) नारळ पाणी सेवन करणे हे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करणे सर्वात फायद्याचे आहे. हे पहाटेची सुस्तपणा दूर करते आणि नवीन उर्जा देते, जेणेकरुन आपण दिवसभर ताजेतवाने राहाल. 

३) हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाबात) नारळ पाण्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.

४) नारळपाण्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तसेच हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढविण्यात मदत करते. त्याचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते.

५) नारळ पाण्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी केला जातो. त्यात कॅलरी कमी असल्यामुळे ते पचणे सोपे जाते, असे अनेक घटक त्यात आढळतात, जे वजन आणि लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त ठरतात.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT