पुणे : पावसाळ्यात सर्वत्रच डास मोठ्या प्रमाणात दिसून येतात. घराबाहेर, रस्त्यावर आणि आडरानात ये जा करताना डासांचा कळप आपल्या डोक्यावर फिरू लागतो. डास हे उद्याने, मैदान आणि अगदी घरीसुद्धा आपला पाठपुरावा करणं सोडत नाहीत. त्यावेळी लाखो प्रयत्नानंतरही त्यांच्यापासून सुटका करणे कठीण होते. आपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की, काही लोकांनाच डास अधिक त्रास देतात. यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत.
शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, माणसांना फक्त मादी डासच चावतात. याचे कारण मादी पुनरुत्पादनाशी संबंधित आहे. खरं तर मादी डास मानवी रक्तात असलेले पोषक आहार घेतल्यानंतरच अंडी देतात.
डासांना कार्बन डाय ऑक्साईडचा वास देखील माणसांकडे वेगाने आकर्षित करतो. मादी डास त्याच्या संवेदनाक्षम जीवांसह त्याचा वास शोधतो. मानवी शरीरातून श्वास बाहेर टाकताना सीओ 2 वायू बाहेर पडल्यामुळे डास काही लोकांना चावतात. 150 फूट अंतरावरुन देखील डासांना त्याचा वास अगदी सहजपणे सापडतो.
संशोधकांचा असा दावा आहे की, काही वास डासांना अधिक वेगाने आकर्षित करतात. मानवी त्वचेमध्ये राहणा-या बॅक्टेरियातून सोडल्या जाणार्या युरिक अॅसिड, लॅक्टिक अॅसिड आणि अमोनियाच्या गंधापेक्षा डास मानवांच्या जवळपास फिरतात. शरीराच्या तापमानामुळे, हे घटक एखाद्या व्यक्तीच्या घामामध्ये सोडले जातात.
जपानमधील संशोधकांनी हे सिद्ध केले आहे की, डास हे 'ए' रक्तगटापेक्षा 'ओ' रक्तगटाच्या लोकांना अधिक चावतात. या रक्तगटाचे लोक डासांच्या चुंबकांसारखे काम करतात. तर 'बी' रक्तगटाच्या लोकांना डास सामान्यत: च कमी प्रमाणात चावतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.