Live to Laugh
Live to Laugh Sakal
health-fitness-wellness

हसण्यासाठी जगा : प्रज्वलित मनाने, देऊ जगण्याला स्फूर्ती!

मकरंद टिल्लू

‘जगामध्ये अंधार आहे तसंच जगामध्ये प्रकाशही  आहे.  संध्याकाळ झाली की आपण म्हणतो अंधार पडला, पण खरं तर अंधार तिथेच असतो. प्रकाशाचा अभाव होतो, तेव्हा अंधाराची  जाणीव व्हायला लागते. जीवसृष्टीमध्ये प्रकाश हा नवचैतन्य घेऊन येतो. आपल्या मनातही नकारात्मक  भावभावना, विचार हे अंधार स्वरूपातच असतात. अंधार जाण्यासाठी मेणबत्ती लावावी लागते, लाइट लावावा लागतो.  तसंच नकारात्मकतेचा अंधार घालवण्यासाठी सकारात्मकतेचा दिवा विचारपूर्वक लावावा लागतो.   

रात्रीच्या वेळेला रस्त्यावरती दिव्याखाली एक माणूस काहीतरी शोधत होता.  बाजूने एक पोलिस जात होता. तो त्या माणसाला म्हणाला, ‘काय करतोयस?’ तो माणूस म्हणाला, ‘माझ्या गाडीची किल्ली हरवली आहे. ती शोधतोय.’' पोलिसाच्या मनात मदत करण्याची इच्छा येते.  दोघेजण  त्या परिसरात  किल्ली शोधायला लागतात, पण किल्ली काही सापडत नाही. शेवटी वैतागून पोलिस विचारतो, ‘अरे, किल्ली कुठे पडली आहे, ते तरी आठवतंय का?’ त्याबरोबर तो माणूस म्हणतो, ‘‘हो आठवतंय.’ ...आणि  लांबवर बोट दाखवून म्हणतो, ‘तिकडे हरवली आहे.’ पोलिस  चिडून म्हणतो,  ‘‘किल्ली तिकडं हरवली आहे. मग आपण इकडं का शोधतोय?' त्यावर तो माणूस म्हणतो, ‘तिकडं अंधार आहे ना!  इकडं  प्रकाश!! म्हणून इथं शोधतोय.’

मुद्दा एवढाच आहे. अंधार आहे, म्हणून घाबरून दुसरीकडं किल्ली शोधली तर ती सापडणार नाही. तसंच तुमच्या आमच्या मनात जिथं अंधार आहे, तिथंच प्रकाश नेऊन उत्तरं सापडवावी लागतात.

सगळी माणसं अंधारात सारखीच असतात.  ज्ञान आणि  बुद्धिमत्तेचं तेज त्यांना इतरांपासून वेगळं करतं. मनातला नकारात्मकतेचा अंधार काढण्यासाठी त्याच्या मुळापर्यंत जावं लागतं. कोणाला एखाद्या व्यक्तीची भीती वाटते. कोणाला ‘असं काही घडलं तर?’ असा विचार करून भीती वाटते.  कोणाला दुसऱ्याच्या प्रगतीचा मत्सर वाटतो, कोणाला आजूबाजूच्या लोकांचा राग येत राहतो,  तर कोणाला ‘जगण्यात अर्थ राहिला नाही,’ असं वाटत नैराश्य निर्माण होतं. 

काळ्या रंगाच्या काचा लावलेली बिल्डिंग किंवा गाडीवर, बाहेरून प्रकाश पडला तरी काचा काळ्याच राहतात. पण आतून प्रकाश टाकला, तर त्याचा आतला भाग उजळून जातो. म्हणून आपल्या मनातही आतून प्रकाश निर्माण करण्याची गरज आहे. आपल्याला जे काही वाटतं, ते आतून येत असतं. इतर प्राणी आणि माणूस ह्यात एकच फरक आहे. तो म्हणजे बुद्धीचा वापर करून निर्माण झालेल्या नकारात्मकतेला नियंत्रणात ठेवण्याची क्षमता माणसात आहे.  तसंच ‘त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं?’ याचा विचार करता येतो. राग. अहंकार. मत्सर, विकृती, स्वार्थीपणा इत्यादी विकारांच्या रूपाने मनात अंधार आहे.  तर दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणा, कृतज्ञता, आनंद, समाधान, त्याग यांच्या रूपाने प्रकाशपण आहे. 

घराच्या दारात पणती.  बाथरूममध्ये दिवा, घराच्या खोलीत ‘ट्यूब’, मैदानात ‘फ्लडलाईट’ याचा वापर केला जातो.  थोडक्यात, जसा अंधार असेल तसा प्रकाश निर्माण केला जातो. आपल्या मनात कोणत्या प्रकारचा अंधार आहे, याचा अभ्यास केला तर सुयोग्य विचार व भावनांचा प्रकाश पाडता येतो. अंधाराची भीती वाटणाऱ्या मुलांपेक्षाही,  प्रकाशाची भीती वाटणारी मोठी माणसं तयार झाली तर समाजात नैराश्य  निर्माण होतं. म्हणूनच कधी ज्योतीनं ज्योत पेटवूया, तर कधी स्वतःचं मन स्वत:च प्रज्वलित  करूया!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT