Cancer Sakal
आरोग्य

Cancer Patients: कॅन्सरचा बळी ठरतायत पन्नाशीच्या आतले लोक; येत्या १० वर्षांत...; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

गेल्या ३० वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णसंख्येमध्ये एकूण ७९ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

वैष्णवी कारंजकर

जगभरात कॅन्सरवर सातत्याने नवनवीन संशोधन होत आहे. पण तरीही हा आजार असाध्य रोगांच्या यादीमध्येच आहे. या आजारासंदर्भात नुकताच प्रकाशित करण्यात आलेला एक अहवाल भीतीदायक आहे. या अहवालानुसार, जगभरामध्ये ५० वर्षे वयाच्या आतल्या लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण अधिक वाढताना दिसत आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णसंख्येमध्ये एकूण ७९ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नलने आपल्या अभ्यासाच्या आधारे हा अहवाल प्रकाशित केला आहे.

या अहवालामध्ये २०१९ पर्यंतच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. या अहवालानुसार, १९९० ते २०१९ या कालावधीमध्ये कॅन्सरचे रुग्ण १८.२ कोटींवरुन ३२.६ कोटींपर्यंत वाढले आहेत. तसंच कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये या कालावधीत २८ टक्के वाढ झाल्याचंही या अहवालामध्ये म्हटलं आहे. जगभरात २०४ देशांमध्ये २९ प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांच्या संबंधित आकडेवारीच्या आधारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

भारतात कॅन्सरचे रुग्ण वाढण्याचं कारण काय?

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, नारायण हेल्थचे अध्यक्ष डॉ. देवी शेट्टी यांनी सांगितलं की ३० वर्षांमध्ये निदान करण्याची उपकरणेही अत्याधुनिक झाली आहे. याशिवाय तपासणीच्या सुविधाही वाढल्या आहेत. त्यामुळे जास्त लोक तपासण्या करून घेतात. आधी खूप कमी लोक रुग्णालयांपर्यंत पोहोचू शकत होते. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये राहणारे लोक तपासणी करत नव्हते. या कारणांमध्ये प्रदूषण, अनियमित आहार, अपुरा व्यायाम यांचाही समावेश आहे.

दुसऱ्या एका अभ्यासानुसार, नुकत्याच आढळलेल्या काही रुग्णांपैकी बहुता्ंश रुग्ण ५० वर्षे वयापेक्षा कमी वयाचे आहेत. प्रोस्टेट आणि विंडपाईप कॅन्सरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून आली आहे. दरवर्षी जवळपास २.२८ टक्के या दराने हे दोन्ही प्रकारचे कॅन्सर मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. तर लिव्हर कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मात्र घट झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यामागे हिपॅटायटिस बीची लस हेही कारण असू शकतं. कारण या लसीमुळे लिव्हर कॅन्सरचं प्रमाण कमी झालं आहे. पचनासंदर्भातल्या कॅन्सरचंही प्रमाण वाढताना दिसत आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १० वर्षांमध्ये कॅन्सरचं रुप अधिक भयावह होणार आहे. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २१ ते ३१ टक्क्यांची वाढ होऊ शकते. तर ४० वर्षे वयाच्या लोकांना कॅन्सरचा अधिक धोका असेल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कॅन्सरमध्ये जनुकीय कारणांसोबतच मांस, मीठ, दारू, तंबाखू, गुटखा खाणं, या सवयींमुळे ५० वर्षांच्या आतले लोकही कॅन्सरचा बळी ठरत आहेत. २०२२ मध्ये भारतात जवळपास १४ लाखांहून अधिक कॅन्सरचे रुग्ण आढळले आहेत. २०२५ पर्यंत हा आकडा १५ लाखांहूनही जास्त होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT