Sex Life esakal
आरोग्य

Sex Life: लग्नानंतर रोज शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं का? याबाबत तज्ज्ञ सांगतात..

रोज सेक्स केल्याने वजन वाढतं असे अनेक महिलांना वाटते

सकाळ डिजिटल टीम

Sex Life: लग्न झालेल्या नवीन तरूण तरूणींना शारीरिक संबंधांबाबत अनेक प्रश्न पडतात. आठवड्यातून किती वेळा सेक्स केलेला चांगला, सेक्स करण्याची योग्य वेळ कोणती, कशा पद्धतीने सेक्स केला तर आपल्याला जास्त आनंद मिळू शकतो अशा अनेक प्रश्नांचा समावेश त्यात असू शकतो. त्यातही लग्नानंतर वजन वाढलेल्या अनेक तरूणींना आपले लग्नानंतर नियमित सेक्स केल्याने वजन वाढले आहे असेही सतत वाटत असते.

लग्नानंतर होणारे शारीरिक संबंध खरं तर फार महत्वाचे असतात. मानसिक स्थिरता, हॉर्मोनल चेंज यासाठी नवरा बायकोमध्ये शारीरिक संबंध असणे फार महत्वाचे असते. पण अनेकींना लग्नानंतर सेक्समुळे वजन वाढते असे वाटते. आता हे कितपत खरंय ते जाणून घेणे महत्वाचे ठरते.

सेक्स आणि वजन यांचा काय संबंध?

प्रसिद्ध लैंगिक व वैवाहिक तज्ज्ञ सांगतात, स्त्रीयांचे वजन वाढण्याचा लैंगिक संबंधांशी काहीही संबंध नाही. वजन वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र सेक्स केल्याने वजन वाढतं हा मुळात गैरसमज आहे. स्त्रियांना उद्भवणाऱ्या अनेक समस्यांमुळे वजन वाढू शकतं. पीसीओडी, प्रीमॅच्युअर मेनोपॉज किंवा अनियंत्रित डाएट यामुळेही स्त्रीयांचं वजन वाढू शकतं. वजन वाढण्यामागे आरोग्याच्या बऱ्याच समस्याही जबाबदार असू शकतात. अनेकदा मानसिक ताणतणावामुळेही वजन वाढतं.

शारीरिक संबंधाचे फायदे की तोटे?

शारीरिक संबंधाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक संबंधांमुळे शरीरात हॉर्मोन्सची निर्मिती होते. या हॉर्मोन्समुळे आपल्याला मानसिक समाधान मानसिक शांती मिळते. आपला आत्मविश्वास वाढतो. शारीरिक संबंधांमुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते. एवढंच नाही तर रक्ताभिसरण सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. शारीरिक संबंधांमुळे पचनक्रिया सुधारण्याबरोबरच त्वचादेखील उजळ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT