diabetes care sakal
आरोग्य

संवाद : टाइप-२ : मधुमेहाची काळजी

आधुनिक काळात मधुमेही रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यात ‘टाइप २’ मधुमेहींचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात सुमारे ९० टक्के रुग्ण अशा प्रकारचे आहेत.

डॉ. शशांक शहा, बॅरियाट्रिक सर्जन

आधुनिक काळात मधुमेही रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यात ‘टाइप २’ मधुमेहींचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात सुमारे ९० टक्के रुग्ण अशा प्रकारचे आहेत. लठ्ठपणा आणि मधुमेह याचा जवळचा संबंध आहे. याचं वैद्यकशास्त्रीय कारण म्हणजे, शरीरात मेदापासून (फॅट) वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव तयार होतात. त्यामुळे लठ्ठ रुग्णांमधील इन्शुलिनची ‘अॅक्शन’ कमी होते. त्याला ‘इन्शुलिन रेजिस्टंट’ असे म्हणतात.

अशा रुग्णांना मधुमेह सहजासहजी नियंत्रित होत नाही. या रुग्णांचे स्वादुपिंड (पँकरिया) इन्शुलिन तयार करू शकते. परंतु तयार झालेले इन्शुलिन शरीराला वापरता येत नाही. वेगवेगळ्या अवयवांचे स्नायू, पेशी यांच्यापर्यंत ते तयार झालेले इन्शुलिन पोचू शकत नाही. त्यातून अतिलठ्ठ माणसांमध्ये ‘टाइप-२’ प्रकारचा मधुमेह असतो. अशा रुग्णांना मधुमेह नियंत्रणासाठी इन्शुलिन सुरू करण्याची गरज नसते.

कारण, शरीरात इन्शुलिनचे प्रमाण खूप जास्त असते. अतिलठ्ठपणा आणि मधुमेह याबरोबरीने रक्तदान, कोलेस्टेरॉल, सांधेदुखी, घोरणे असे इतर आजार रुग्णाला झालेले असतात. हीदेखील लठ्ठ रुग्णांमध्ये मधुमेहाचा धोका वाढण्यामागची प्रमुख कारणे आहेत.

फॅटी लिव्हर

लठ्ठ रुग्णांच्या यकृतामध्ये फॅट जमा होते. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘फॅटी लिव्हर’ म्हणतात. त्यामुळेही मधुमेह अनियंत्रित होण्याची शक्यता वाढते. यकृतामधील फॅट हे उपाशी पोटीच्या साखरेचे प्रमाण खूप वाढवते. अशा रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित करण्याचे वेगवेगळे उपाय असतात, त्यातील सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी चौरस आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक असतो.

त्यातूनही ते कमी होत नसेल तर, काही औषधे घेता येतात. त्यातूनही वजन कमी न झाल्यास लॅप्रोस्कोपिक मेटॅबोलिक बेरियाट्रिक सर्जरी करणे हा योग्य पर्याय वैद्यकशास्त्राप्रमाणे शिल्लक रहातो. त्याच बरोबर ज्याचं पोट खूप मोठं आहे, घोरणं जास्त आहे, तसेच मधुमेहामुळे सांधेदुखी, नसांचा आजार, डोळ्यांचे विकार, मूत्रपिंडाचा आजार झालेल्या रुग्णांमध्ये बेरियाट्रिक सर्जरी परिणामकारक ठरते.

बीएमआय - गेल्या पन्नास वर्षांच्या संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) ३५ पेक्षा जास्त असेल आणि रुग्णाचा मधुमेह नियंत्रित नसेल तर बेरियाट्रिक सर्जरी उपयुक्त ठरते. त्यातून खूप वर्षांपर्यंत रुग्णाचा मधुमेह कमी रहातो. मधुमेहामुळे होणारी इतर गुंतागुंत प्रतिबंधित होते. त्यामुळे वजन आणि मधुमेह एकत्र आल्यानंतर त्यावर वेळेवर शास्त्रीय उपाय करण्याची आवश्यकता आहे.

लो कॅलरी डाएट

आधुनिक काळात कमी उष्मांक आहाराबद्दल (लो कॅलरी डाएट) खूप बोलले जाते. मात्र, त्यानुसार आहार घेणे सर्वच रुग्णांना सहजा-सहजी जमत नाही. अत्याधुनिक वैद्यकीय प्रगतीमुळे भूक कमी करणारी औषधे उपलब्ध झाली आहेत. इंजेक्शन किंवा गोळ्यांच्या स्वरूपामध्ये ही औषधे आहेत. त्यामुळे भूक कमी होऊन मधुमेह सुधारला जातो. मात्र, ही औषधे रुग्णांना दीर्घकाळपर्यंत घ्यावी लागतात. मात्र, लठ्ठपणा आणि मधुमेही रुग्णांसाठी यावर मर्यादा पडतात.

(लेखक , बेरियाट्रिक सर्जन, एलओसी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT