Metabolic and Bariatric Surgery sakal
आरोग्य

संवाद : मधुमेहावरील नियंत्रणासाठी मेटाबोलिक आणि बेरियाट्रिक सर्जरी

मधुमेह हा चयापचयाचा आजार आहे. त्यामुळे मेटाबोलिक आणि बेरियाट्रिक सर्जरी हा मधुमेह नियंत्रणाचा उत्तम मार्ग.

डॉ. शशांक शहा, बॅरियाट्रिक सर्जन

मधुमेह हा चयापचयाचा आजार आहे. त्यामुळे मेटाबोलिक आणि बेरियाट्रिक सर्जरी हा मधुमेह नियंत्रणाचा उत्तम मार्ग असल्याचे आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या विविध संशोधनातून अधोरेखित झाले आहे.

याला मेटाबोलिक सर्जरी का म्हणतात, असा प्रश्न सहजपणे आपल्याला पडतो. दुर्बिणीतील शस्त्रक्रिया रुग्णाचे बिघडलेले पचनसंस्थेचे कार्य पूर्ववत करते त्याला मेटाबोलिक सर्जरी म्हणतात. म्हणूनच मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल, मेटाबोलिक सिंड्रोम अशा आजारांसाठी ही शस्त्रक्रिया परिणामकारक उपाय असल्याचे जगभरात सांगण्यात येत आहे.

रुग्णावर ही शस्त्रक्रिया दुर्बिणीतून केली जाते. पोटावर तीन छोटे छेद घेऊन शस्त्रक्रिया होते. त्यासाठी मोठा काप रुग्णाच्या पोटावर घ्यावा लागत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण स्वतः चालतो. तसेच, दुसऱ्या दिवशी त्याला घरीही सोडले जाते.

ही शस्त्रक्रिया कशी काम करते?

दुर्बिणीतून ही शस्त्रक्रिया रुग्णाच्या जठरावर आणि लहान आतड्यांवर केली जाते. या अंतर्गत जठराचे दोन कप्पे तयार केले जातात किंवा, जठराचा आकार कमी केला जातो. तसेच, त्याच वेळी त्याला आतडे शस्त्रक्रिया करून जोडले जाते. त्यामुळे खाल्लेले अन्न आतड्यांमधून थोडेसे लवकर बाहेर पडते. जठर आणि आतड्यांमधून तयार होणाऱ्या उपयुक्त स्रावांचे प्रमाण वाढते.

रुग्णाला हानीकारक असलेल्या स्रावांचे प्रमाण या शस्त्रक्रियेमुळे लगेच कमी होण्यास सुरवात होते. आपल्या मेंदूमध्ये वजन नियंत्रित करणारी व्यवस्था असते. त्यावरदेखील ही शस्त्रक्रिया काम करते. शरीरातील सर्व मेद विरघळून त्याचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते. त्यामुळे रुग्णाचे वजन हळूहळू कमी होऊ लागते. रक्तदाब, कोलेस्टेरॉलसारखे आजार कमी होतात. मधुमेह बरा होण्याची प्रक्रियेलाही या शस्त्रक्रियेमुळे गती मिळते.

मधुमेहावर काय परिणाम होतो?

आपण समोर येईल ते आणि तेव्हा खात असतो. त्यामुळे वजन वाढते. त्याच बरोबर मधुमेहाला सुरवात होते. आपल्याला वाटते. की आहारातून वजन नियंत्रित करू आणि त्यातून मधुमेह व्यवस्थापन होऊ शकेल. लठ्ठ रुग्णासाठी हे खूप मोठे आव्हान असते. अशा वेळी स्थूलता असलेल्या रुग्णांनी आहार आणि बेरियाट्रिक सर्जरीतून वजन कमी करण्याचा मधुमेहावर नेमका काय परिणाम होतो, याची शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे.

आहार नियंत्रित केल्यास रुग्ण चांगल्या प्रकारे मधुमेह नियंत्रण करू शकतो. पण, बेरियाट्रिक सर्जरीनंतर जेमतेम २४ ते ४८ तासांमध्ये मधुमेह निघून जातो. थोडेसुद्धा वजन कमी होण्याआधीच मधुमेह जातो, याचे कारण संप्रेरकांमधील (हार्मोन्स) बदल असतो. त्यानंतर वजन कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते. रुग्णाचे पोट सुटलेले असेल तरीही मधुमेहावर उपचार होऊ शकतो.

(लेखक बेरियाट्रिक सर्जन आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

NASA Scientist Salary: NASA मध्ये संशोधन शास्त्रज्ञाला किती पगार मिळतो; जाणून घ्या सुविधा काय आहेत?

SCROLL FOR NEXT