how many times you drink coffee.. know its disadvantages
how many times you drink coffee.. know its disadvantages सकाळ
आरोग्य

कॉफी पिणं पडू शकतं महागात; Heart Attack येण्याचा धोका

सकाळ डिजिटल टीम

अनेक जणांना चहापेक्षा कॉफी पिणे खुप आवडते कारण कॉफी ही माणसाला फ्रेश ठेवते पण म्हणतात ना की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक माणसाला विनाशाकडे नेतं. हे खरंय. दिवसातून दोनदा कॉफी पिणे योग्य आहे पण जर तुम्ही त्यापेक्षा अति जास्त कॉफी पित असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यातील काही दुष्परिणाम देखील आहेत. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या आरोग्यासाठी इजा पोहचवतात. त्यातील काही महत्त्वाचे दुष्परिणाम आज आपण जाणून घेणार आहोत. (how many times you drink coffee? know its disadvantages)

झोप न येणे-

कॉफी ही झोप पळवण्यात खुप प्रभावित आहे. कॉफीमध्ये आपली झोप किंवा सुस्ती नष्ट करण्याची ताकद आहे. परंतु जास्त प्रमाणात कॉफी सेवन केल्याने योग्य झोप होत नाही आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर परीणाम होतो.

चिडचिड किंवा अस्वस्थता जाणवणे -

कॉफीचे जास्त सेवन केल्याने काही लोकांना चिडचिड किंवा अस्वस्थता जाणवू शकते. कॉफी काही लोकांसाठी ऊर्जा बूस्टर असू शकते परंतु ज्यांना एंग्जाइटीचा त्रास असतो त्यांनी कॉफी जास्त न घेणेच बरे.

हार्मोनल बदल -

कॉफीमध्ये असणारी कॅफीन माणसाच्या शरीरात अनेक बदल घडवून आणते. यामुळे हार्मोनल बरेच होतात. सोबतच इस्ट्रोजेनच्या पातळीत बदल झाल्याने स्त्रियांना धोका निर्माण होतो.

हृदयविकाराचा धोका वाढतो -

दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील एका अभ्यासानुसार जे लोक दररोज अति जास्त कॉफी पितात त्यांच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. हृदयविकाराचा धोका वाढतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT