Health news 
आरोग्य

Health : मिठाचे पाणी रोज पिल्याने आरोग्याला दुहेरी फायदे होतात; कसे जाणून घ्या

अनेक समस्या दूर करण्यासाठी मीठाचे पाणी फायदेशीर मानले जाते.

सकाळ डिजिटल टीम

निरोगी शरीरासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. परंतु या पाण्यात थोडेसे मीठ टाकल्यास त्याची चव आणि फायदे दुप्पट होतात. मिठाचे पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. विशेषत: याने शरीराची सूज, घसादुखी, पचनाच्या समस्यांवर मात करता येते. याशिवायही अनेक समस्या दूर करण्यासाठी मीठाचे पाणी फायदेशीर मानले जाऊ शकते. दरम्यान, आज आपण मिठाच्या पाण्याचे फायदे पाहणार आहोत. आरोग्यासाठी हे पाणी कसे उपयोगी पडते ते जाणून घेणार आहोत.

  • मिठाचे पाणी पिण्याचे फायदे

घसा खवखवण्यापासून आराम

मीठाचे पाणी प्यायल्याने घसादुखीपासून आराम मिळतो. मीठाच्या पाण्याचे सेवन केल्याने घशातील सूज, खाज आणि वेदना यापासून आराम मिळतो. यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास मीठ पाणी प्या.

पचनक्रिया निरोगी ठेवा

पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी मीठ पाणी प्या. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. ते वापरण्यासाठी, 1 ग्लास पाणी घ्या. त्यात थोडे काळे मीठ किंवा रॉक मीठ घाला. त्यानंतर हे पाणी प्यावे. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारू शकते.

मेंदू निरोगी ठेवा

मिठाचे पाणी प्यायल्याने तुमच्या मेंदूलाही खूप फायदा होतो. यामुळे मेंदूचा विकास होईल. यासोबतच तणाव आणि नैराश्यही कमी होईल.

शरीर हायड्रेटेड ठेवा

तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मीठ पाणी प्रभावी आहे. याच्या मदतीने तुम्ही डिहायड्रेशनच्या समस्येवर मात करू शकता. मीठामध्ये असलेले सोडियम आणि मॅग्नेशियम तुमच्या शरीरातील द्रवपदार्थ संतुलित करतात, ज्यामुळे शरीराला हायड्रेट करता येते.

सूज कमी करा

मिठाचे पाणी प्यायल्याने शरीराची सूज कमी होते. मिठात असलेले मॅग्नेशियम शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. विनाकारण शरीरात सूज येत असेल तर मिठाच्या पाण्याचे सेवन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

Latest Marathi News Updates: तासगांव तालुक्यातील पेड गावात बिबट्या कोंबड्या खायला गेला आणि खुराड्यात अडकला

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

MP Dhairyasheel Patil: उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन: खासदार धैर्यशील मोहिते-पाटील;'आगामी निवडणुका मविआ एकत्रितच लढणार'

Ayush Komkar प्रकरण पोलिसांची मोठी कारवाई, पण मास्टरमाईंड अजूनही फरार..| Andekar Toli | Sakal News

SCROLL FOR NEXT