आरोग्य

Health News : सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय? कोणते उपाय कराल पहा..

काही जण उठल्यानंतर ऑफिसमध्ये दिवसभर जांभई देत राहतात.

सकाळ डिजिटल टीम

सकाळी उठल्यानंतर तासंतास अंथरुणावर पडून राहण्याची तुम्हालाही सवय आहे का?. अनेकजण उठल्यानंतर टाईमपाससाठी बेडवर पडून मोबाईल बघतात. काही जण उठल्यानंतर ऑफिसमध्ये दिवसभर जांभई देत राहतात.

आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे. जर झोप झाली नसेल तर संपूर्ण दिवस आऴसवाणा जातो. अपूर्ण झोप अनेक आजारांना निमंत्रण देते. सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याचे कारण तुमचे बिझी शेड्यूल असू शकते. सकाळी थकवा जाणवत असेल तर हे उपाय नक्की करून बघा.

बॉडी मसाज

आयुर्वेदात ही फार जुनी पद्धत मानली जाते. ही थेरपी करून तुम्ही तुमचा आळस दूर करू शकता. सकाळी उठल्यानंतर संपूर्ण शरीराला सुमारे 20 ते 25 मिनिटे मसाज करा. याने तुम्हाला फ्रेश वाटेल. त्याचबरोबर शरीरातील रक्ताभिसरणही चांगले होते.

सूर्योदयापूर्वी उठा

जर तुम्हाला सकाळी उठणे हे मोठे कष्टाचे काम वाटत असेल. तर यासाठी तुमच्या या सवयीमध्ये बदल करा. यासाठी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे मन ताजेतवाणे राहिल. सकाळी लवकर उठल्यानंतर योगासने करा.

आहारात बदल करा

आहाराचा समतोल साधता न आल्याने शरीर आळशी होते. यामुळे तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा आहार कमी घेता येतील हे पहा. निरोगी राहाण्यासाठी हिरव्या भाज्या आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा. तसेच गरम आणि पुर्ण शिजवलेले अन्न खावे.

दिवसा झोपू नका

दिवसा झोपण्याची सवय असणाऱ्यांना रात्री लवकर झोप येत नाही. त्यामुळे दिवसा न झोपण्याची सवय लावा.

दिनक्रम बनवा

जी कामे केल्यानंतर शांत झोप मिळेल अशी कामे झोपण्याआधी जरुर करा. काहींना झोपण्याआधी पुस्तक वाचण्याची सवय असते तर काहीजण ध्यान करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT