Women Marriage age 21 years Esakal
आरोग्य

मुलींचं लग्न २१ वर्षे वयानंतर झाल्यास गर्भधारणा-गर्भपातावर काय परिणाम होतो

Impact of marriage age on women's health- विवाहाचा संबंध थेट गर्भधारणेशी असल्यामुळे या कायदेशीर प्रस्तावाचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

लग्नाच्या वयाचा स्त्रियांच्या आरोग्यावर होणारा परिणाम (Impact of marriage age on women's health)-

भारतातील (India) मुलींच्या लग्नाच्या (Marriage age of women's in India) कायदेशीर वयात सुधारणा करण्यासाठी गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या शिफारशींवर आधारित एक प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Cabinet) बुधवारी मंजूर केला. ज्यामध्ये मुलींच्या लग्नाचे वय (Marriage age of women) १८ वरून २१ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे काही लोक मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय वाढवण्याचं समर्थन करत आहेत, तर अनेक संघटना विरोध करत आहेत. देशातील मातृत्वाचे वय, मातामृत्यू कमी करण्याची गरज आणि पोषण आहारात सुधारणा आदी बाबी लक्षात घेऊन वयात सुधारणा करण्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे यावर निर्णय घ्यावा का, असा प्रश्न अजूनही लोकांच्या मनात आहे. महिला आणि मुलींना खरोखरच फायदा होतो का? की हानी होईल?

या संदर्भात फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट (Fortis Memorial Research Institute) गुडगावच्या संचालिका व प्रमुख तसेच दिल्ली एम्सच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या माजी प्रमुख डॉ. सुनिता मित्तल यांच्याशी संवाद साधला आहे. ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ (Gynecologist) डॉ. सुनिता सांगतात की, लग्नाचे वय वाढण्यापूर्वीच भारतात महिलांच्या आरोग्यासाठी (Health) आणि सुरक्षिततेसाठी (Security) अनेक कायदे करण्यात आले आहेत, मात्र कोणत्याही कायद्याची संपूर्ण देशभरात योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे ही सर्वात मोठी गरज आहे. अशा स्थितीत हा प्रस्तावाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्याची योग्य अंमलबजावणी झाल्यास महिलांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

लग्नाच्या वयाचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम (Impact of marriage age on women's health-)-

विवाहाचा संबंध थेट गर्भधारणेशी असल्यामुळे या कायदेशीर प्रस्तावाचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होणार आहे. वैद्यकीयदृष्ट्या पाहिल्यास टीनएज प्रेग्नन्सीमधील अडचणी आणि समस्या तुलनेने अधिक असतात. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर किशोरवयीन म्हणजेच 19 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली जर गरोदर राहिल्या तर तिच्या गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत अनेक समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच मुलींना लग्नानंतर शारीरिक आणि मानसिक परिपक्वता येईपर्यंत दोन-तीन वर्षांच्या अंतरानंतरच गरोदर राहण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ नेहमीच देतात.

1. गर्भपात (Abortion) किंवा गर्भपाताची प्रकरणे-

डॉ. मित्तल म्हणतात की किशोरवयीन किंवा कमी वयात मुलींमध्ये गर्भपात किंवा गर्भपाताची प्रकरणे जास्त असतात. 21 नंतर ही भीती कमी होते. त्यामुळे लग्नाचे वय वाढल्याने गर्भपात किंवा गर्भपाताची प्रकरणे कमी होणे अपेक्षित आहे.

2. प्री-मॅच्युअर (Pre-Mature) किंवा कमी वजनाचे मूल असणे किंवा मुलाचा मृत्यू होणे-

डॉक्टर म्हणतात की जर आपण निरोगी गर्भधारणेबद्दल बोलायचं झालं, तर हे वय 21 पासून ते 28-30 वर्षे आहे. या वयात ज्या स्त्रिया गर्भवती होतात त्या तुलनेने निरोगी बाळाला जन्म देतात. त्यांची मुलेही निरोगी आणि पूर्ण वजनाची असतात. याशिवाय लहान वयात बालकांचा जन्म झाल्यानंतर बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढते आणि मातांनाही धोका होतो.

3. महिला आणि मुलांचे आरोग्य (Womens and child Health)-

मित्तल सांगतात की 21 ते 25 दरम्यान गर्भधारणा झाल्यास आई आणि बाळाला पोषणाच्या समस्याही कमी होतात. अजूनही १८ वर्षांखालील विवाह होत आहेत,हे योग्य नाही.

4. सिझेरियन (cesarean) प्रसूतीची शक्यता वाढते-

डॉ मित्तल सांगतात की, लवकर गर्भधारणेमुळे सामान्य प्रसूतीऐवजी सिझेरियन किंवा सी-सेक्शन प्रसूतीचे प्रमाण थोडे वाढले आहेत.

5. पोषण (Nutrition)-

वयाच्या 20 वर्षापूर्वी, कोणत्याही मुलीला स्वतःसाठी अधिक पोषण आवश्यक असते. अशा स्थितीत लग्न झाल्यानंतरही ती या वेळी गरोदर राहिली, तर तिच्या आरोग्यावर परिणाम होतो, जे योग्य नाही. त्यामुळे गर्भधारणेचे वय योग्य असावे.

6. नसबंदी (Vasectomy) -

गर्भधारणेनंतर लगेचच, मुली किंवा महिला नसबंदीसारखे गर्भनिरोधक उपाय करतात. परंतु पुढे काही अडचणी निर्माण झाल्यास त्या या ट्यूब पुन्हा सुरु करण्यासाठी येतात. परंतु त्यामध्ये जटीलता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Shriram Rajurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन; नांदेडच्या ग्रामीण राजकारणातील एक संयमी, विकासाभिमुख नेतृत्व हरपले

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

SCROLL FOR NEXT