लग्न म्हणजे परंपरा, संस्कृती आणि संस्कार यांचा अनोखा मेळ. हा दिवस कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे या दिवसाला खास बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. पण कधी कधी आपल्या छोट्या चुकीच्या नियोजनामुळे लग्नासारखा मोठा कार्यक्रम बिघडतो. यामध्ये योग्य वेडिंग डेस्टिनेशन निवडणे हे देखील खूप महत्त्वाचं काम आहे. आज आम्ही तुम्हाला लग्नाच्या या सीझनमध्ये भारतातील १० सर्वोत्तम वेडिंग डेस्टिनेशनबद्दल सांगणार आहोत, जिथे लग्न सोहळा आयोजित करण्यासाठी लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात.
शिमला- हिरवाई आणि पर्वतांमध्ये नवीन जीवन सुरू करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुमचीही अशी इच्छा असेल, तर तुमचे डेस्टिनेशन वेडिंग शिमल्यातच करण्याचा प्लॅन करा. येथे अशी अनेक रिसॉर्ट्स आहेत जी लग्नाची सर्व व्यवस्था करतात, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टेन्शन नाही आणि तुम्ही आरामात लग्नाचा आनंद घेऊ शकता. शिमल्यात लग्नासाठी उन्हाळा चांगला असतो.केरळ- केरळ हे सुंदर ठिकाणं आणि समुद्रकिनारे यांसाठी प्रसिद्ध आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी केरळ पूर्वीइतके लोकप्रिय नसले, तरी गर्दीपासून दूर शांत जागा पसंत करणारे लोक केरळकडे वळत आहेत. केरळमधील बीच वेडिंग लोकांना आकर्षित करत आहे. कोवलम येथे स्थित, लीला हे भारतातील सर्वोत्तम विवाह रिसॉर्ट्सपैकी एक आहे. सप्टेंबर ते मार्च महिन्यात येथे लग्न करणे उत्तम आहे, कारण पावसाळ्यात केरळमध्ये राहण्याची एक वेगळीच मजा आहे.गोवा- पार्टीलव्हर्ससाठी गोव्यापेक्षा चांगली जागा नाही. लग्नानंतर बहुतेक जोडपी हनीमूनसाठी येथे येतात. गोवा बीच वेडिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. गोवा हे लक्झरी वेडिंग डेस्टिनेशनपैकी एक आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा महिना येथे सर्वोत्तम आहे. यावेळी, येथे अनेक प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे तुमच्या लग्नाची मजा द्विगुणित होईल. मसुरी- जर तुम्ही पर्वतांमध्ये लग्न करण्याचे स्वप्न पाहत असाल तर मसुरी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. जे डब्ल्यू मॅरिओट वॉलनट ग्रोव रिसॉर्ट अॅण्ड स्पा येथे तुम्हाला सर्व सुविधा मिळतील, ज्यामुळे तुमचा लग्नसोहळा स्वप्नवत होईल. येथे ३०० हून अधिक पाहुणे येऊ शकतात.मथुरा- मथुरा हे प्राचीन आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. येथे अनेक सुंदर रिसॉर्ट्स आहेत, जे डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वोत्तम आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या नगरीत लग्न करणे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे तुमच्यासाठी खूप छान अनुभव असेल. इथली संस्कृती, परंपरा आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांच्या तुम्ही प्रेमात पडाल. येथे अनेक सुंदर मंदिरे देखील आहेत. ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात येथे लग्नाचे आयोजन करणे चांगले मानले जाते.ऋषिकेश- ऋषिकेश या पवित्र शहरात लग्न करणे हा एक वेगळाच अनुभव असतो. डेस्टिनेशन वेडिंगसाठी दूर-दूरवरून जोडपी लग्नासाठी येतात. येथील शांत वातावरण, सुंदर मंदिरे आणि निसर्ग लोकांना आवडतो. गंगेच्या काठावर लग्न समारंभासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. राजाजी नॅशनल पार्क हे ऋषिकेशमधील सर्वात लोकप्रिय विवाह स्थळांपैकी एक आहे. ऑक्टोबर ते मार्च हा महिना येथे लग्नासाठी चांगला मानला जातो.गुजरात- गुजरातला आपल्या समृद्ध संस्कृती आणि वारशामुळे राजकुमारांची भूमी देखील म्हटले जाते. जर तुम्हाला शाही विवाह करायचा असेल तर तुम्हाला गुजरातपेक्षा चांगली जागा मिळणार नाही. गुजरातमध्ये असे अनेक भव्य किल्ले आणि आकर्षक विवाह स्थळे आहेत, जी शाही पद्धतीने लग्नाची संपूर्ण व्यवस्था करतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ येथील लग्नासाठी उत्तम आहे.अंदमान आणि निकोबार- जर तुम्हाला गर्दीपासून दूर आरामात समुद्रकिनारी लग्न करायचे असेल, तर अंदमान निकोबार तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. स्वच्छ समुद्रकिनारा आणि सुंदर दृश्यांमुळे अंदमान निकोबार डेस्टिनेशन वेडिंगसाठी लोकप्रिय होत आहे. अंदमानमधील आलिशान रिसॉर्ट्स आणि आदरातिथ्य तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. सप्टेंबर ते मे हा महिना लग्नासाठी चांगला मानला जातो.उदयपूर- रॉयल डेस्टिनेशन वेडिंगमध्येही उदयपूर खूप लोकप्रिय आहे. वास्तुकलेचा समृद्ध वारसा, संस्कृती आणि भव्यता इथल्या लोकांना आकर्षित करते. तलावांनी वेढलेले उदयपूर हे भारतातील सर्वात रोमँटिक शहरांपैकी एक आहे आणि येथे लग्न करणे नेहमीच संस्मरणीय असेल. एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात येथे भेट देणे उत्तम.जयपूर- राजवाड्यांमध्ये शाही विवाह करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही जयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करू शकता. येथे राजवाड्यांमध्ये लग्न साजरे करणे हा एक अद्भुत अनुभव असेल. येथील जय महल पॅलेस हे लोकांच्या आवडत्या रिसॉर्टपैकी एक आहे. या महालात लग्न करणं, हे खरंच स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. लग्नासाठी हिवाळा हंगाम उत्तम आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.