Don't eat this food after 30 years Sakal
वय वाढण्यासोबतच शरीरात बदल होत असतात. तीस वर्ष वयानंतर आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवा. जर तुम्ही काही गोष्टी खाणं टाळल्या तर तुमचं हृदय, लिव्हर, किडनी, हाडे तसेच स्नायूंसमवेत शरीराचे अवयव अनेक वर्षांपर्यंत स्वर्थ राहू शकतील. आज आपण अशा काही खाद्य पदार्थांबद्दल बोलणार आहोत, जे पदार्थ तीस वर्ष वयानंतर खाणं टाळावं. (After the age of 30, special attention should be paid to diet.)
तीस वर्ष वयानंतर आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवा. साखर आणि गोड पदार्थ-30 वर्ष वयानंतर साखरेचं सेवन कमी करायला हवं. गोड पदार्थांमुळे शरीरात कॅलरी वाढतात. त्यामुळे मधुमेह, अतिलठ्ठपणा तसेच हाडांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 30 वर्ष वयापर्यंत अनेकांना चहा कॉफीचं व्यसन असते. परंतु त्यामध्ये कॅफीनचं प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे रक्तदाब, मायग्रेन, डोकेदुखी इ. समस्या निर्माण होऊ शकतात. फास्ट फूड, जंक फूड तसेच तेल-मसालेवाले पदार्थ खाणे टाळा. मैद्यापासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू खाणं टाळा. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तिशीनंतर प्रमाण थोडं कमी करा. कारण मांस पचायला जड असतं. त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
वयाच्या तिशीनंतर दारू-बियरपासून दूर राहावे. दारूमुळे तुमची किडनी तसेच लिव्हर खराब होतो. तसेच अनेक गंभीर आजारही होतात.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.