आसाममध्ये पूरस्थिती शुक्रवारी (ता.२४) आणखी गंभीर बनली. राज्यातील ४५.३४ लाख लोक पूराने प्रभावीत झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली. ब्रह्मपुत्र आणि बराक नद्यांच्या साहाय्यक नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. असे असताना काही भागांमधील पूराचे पाणी ओसरत आहे. राज्यात पुरामुळे गेल्या २४ तासांमध्ये आणखीन काही लोकांचा मृत्यू झाल्याने या आपत्तीत आतापर्यंत मरणाऱ्या लोकांची एकूण संख्या वाढून १०८ झाली आहे. आसामच्या बराक खोऱ्याचा प्रवेश द्वार मानल्या जाणाऱ्या सिलचरचे बहुतेक भाग जलमय झाले आहेत.
बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) आठ चमूंना इटानगर आण भुवनेश्वर येथून आणले गेले आहे. त्यात एकूण २०७ कर्मचारी आहेत. प्रशासनानुसार जवळपास तीन लाख लोकांना खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी आणि औषधे आदींची टंचाई निर्माण झाली आहे.मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पुराने सर्वात प्रभावित सिलचर शहराची पाहणी केली.सततच्या मुसळधार पावसामुळे १०३ महसूल मंडाळे आणि ४ हजार ५३६ गावे प्रभावित झाली आहेत. आसाममधील खोऱ्यात तीन जिल्हे - कछार, हैलाकांडी आणि करिमगंज बराक आणि कुशियारा नदीच्या वाढत्या पुरामुळे प्रभावित झाले आहे.पुरामुळे १०,०८६९.७ हेक्टरवरील पिके पाण्यात बुडले आहे. बक्सा, बारपेटा, बोगाईगाव, चिरांग आणि धुबरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुख्य भूमीपासून संपर्क तुटले आहे.पुरामुळे १७३ रस्ते आणि २० पुलांचे नुकसान झाले. दुसरीकडे बक्सा आणि दरांग जिल्ह्यांमध्ये दोन-दोन तटबंध तुटले आहे.आसाममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. या स्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी बचाव मोहिम सुरु आहे.आसाममध्ये पुरामुळे बुहतेक भागांना बेटाचे रुप आले आहे. चहूबाजूंनी पाणीच पाणी दिसत आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.