bollywood actors decided to live alone after divorce did not remarry file image
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी घटस्फोट झाल्यानंतर एकटे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अजूनही दुसरं लग्न केलेलं नाही. पाहुयात असे कोणते कलाकार आहेत.
आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता हृतिक रोशनने अभिनेता संजय खानची मुलगी सुझानसोबत 2000 साली लग्न केले. 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुलं आहेत. विभक्त झाल्यानंतर हृतिकनं दुसरे लग्न केलं नाही.बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत 2003 साली लग्न केले. दोघांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. करिश्मा आणि संजय यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता करिष्मा दोन्ही मुलांचा सांभाळत करते. करिष्माने दुसरे लग्न केले नाही.बॉलिवूमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टने मनिष माखीजाशी लग्न केले होते. 2014 मध्ये ते दोघे विभक्त झाले. पूजाने घटस्फोट झाल्यानंतर लग्न न करण्याचा निर्णय घेतला.अभिनेत्री कोंकणा सेनने 2010 मध्ये रणवीर शौरेशी लग्न केले. दोघंही 2020 मध्ये वेगळे झाले. घटस्फोटानंतर कोंकणाने पुन्हा लग्न केले नाही.अभिनेत्री अमृता सिंगनं अभिनेता सैफ अली खानसोबत 1991मध्ये लग्न केले. दोघांना इब्राहिम अली खान आणि सारा अली खान ही दोन मुले आहेत. 2004 साली अमृताने सैफसोबत घटस्फोट घेतला. अमृताने पुन्हा लग्न केले नाही. मात्र, सैफनं अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केलं.अभिनेत्री चित्रांगदाने गोल्फर ज्योती सिंह रंधावाशी लग्न केले होते. 2014 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर चित्रांगदाने 'सिंगल' राहण्याचा निर्णय घेतला.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.