रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) हिंदवी स्वराज्याची (Swarajya) स्थापना केली. स्वराज्यातील गडकिल्ले (Fort) हे स्वराज्याची ताकद होते. महाराजांनी काही किल्ले शत्रूकडून जिंकले होते, काहींची डागडूजी केली, तर काही नव्याने बांधले. महाराष्ट्रामध्ये मोक्याची ठिकाणं पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात अनेक किल्ले बांधले. गोव्यामध्ये देखील महाराजांनी बरंच वर्चस्व निर्माण केलं होते. गोव्यामधील बेतुल किल्ला हा गोव्यामध्ये बांधलेला एकमेव किल्ला होय.
1. बेतुल किल्ला छत्रपती शिवरायांनी गोव्यात बांधलेला एकमेव किल्ला आहे. गोव्यातील कितोल भागात हा किल्ला असून मडगाव पासून दक्षिणेकडे गेल्यास तो साधारण २२ किमी अंतरावर आहे.2. 1679 मध्ये स्वराज्याचे पाईक असणाऱ्या बेतुलच्या हवालदारांनी बांधला होता. याचे पुरावे अर्कायजन अर्कोलॉजीमधील पोर्तुगीजांची कागदपत्रात आढळतात. 3. त्यामध्ये पोर्तुगीज कमांडर आणि बेतुलच्या हवालदार यांच्यातील एक पत्रव्यवहार आहे, त्यामध्ये तो पोर्तुगीज कमांजर म्हणतो की, तुम्ही येथे किल्ला बांधू नका, हे ठिकाण आमच्या अधिपत्याखाली आहे. तुम्ही तसं करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आक्रमण करु.4. यावर बेतुलचा हवादलदार उत्तर देताना म्हणतो की, ही भूमी आमची आहे, आम्हाला तुम्ही रोखू शकत नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा. 5. ‘पोर्तुगीज मराठा रिलेशन’ या पुस्तकात पोर्तुगीज मराठ्यांच्या संबंधांबद्दल माहिती मिळते. मराठे आणि पोर्तुगीजांमध्ये उत्तम व्यापारी संबंध होते असं या पुस्तकाता म्हटले आहे. मराठे तलवारी, दारूगोळा इ. पोर्तुगीजांकडून खऱेदी करत असं या पुस्तकात म्हटले आहे. 6. बैतुल किल्ल्याचं भौगोलिक स्थान पाहिले तर हा किल्ला साळ नदीच्या मुखावर बांधला गेला आहे. ही नदी एकप्रकारे मराठा आणि पोर्तुगीज राज्याची सीमा होती. 7. येथून जवळच साष्टी नावाचा एक श्रीमंत प्रांत होता. तेथील व्यापार हा या ठिकाणाहून चालत असे. म्हणूच येथे हा किल्ला बांधून येथील व्यापारावर कर आकारणी केली जाऊ लागली. 8. महाराजांनंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. त्यांनी त्याचं रुपांतर कस्टम हाऊसमध्ये केले. 9. या किल्ल्याच्या रक्षणासाठी किल्ल्यावर एक तोफही आहे. ही लाँग रेंज तोफ आहे. 10. या किल्लावर एक शिलालेख आढळतो. माहिम आणि मालाडचा ग्रॅनाईटवर हा शिलालेख कोरला आहे. त्यावर पोर्तुगीज भाषेत लिहीलं आहे.11. सध्या या किल्ल्याचे फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत. मात्र काही संघटना या किल्ल्याच्या संवर्धनाचं काम आहेत.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.