कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास, प्रामाणिकपणा आणि प्रेमावर अवलंबून असतो. जर आपल्या नात्यात हे तिन्ही गुण नसतील, तर नातं तुटण्याची शक्यता असते.
कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास, प्रामाणिकपणा आणि प्रेमावर अवलंबून असतो. जर आपल्या नात्यात हे तिन्ही गुण नसतील, तर नातं तुटण्याची शक्यता असते. आपल्या नात्यावरील एकदा का विश्वास उडाला की, ते नातं पुन्हा एकरुप होणं फार कठीण असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही नात्यांबद्दल सांगणार आहोत, जेणे करुन आपल्या नात्यातील 'विश्वास' कायम राहिलं..कोणत्याही नात्यात एकमेकांना वेळ दिला गेला नाही, तर नात्यातील संबंध बिघडण्यास सुरुवात होते. तुम्ही दिवसभरात तुमच्या कामात कितीही व्यस्त असला, तरी तुमच्या जोडीदाराला वेळ द्यायला कधीच विसरू नका. कारण, तुमच्या त्या व्यस्त असण्यामुळं तुमच्या नात्यावर याचा थेट परिणाम होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासाठी तुमचा वेळ खूप मौल्यवान असतो, हेही कधी विसरु नका.लग्नानंतर बऱ्याच जोडप्यांमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचं पहायला मिळतं. घरात मुलांची जबाबदारी, त्याचं संगोपण आदी सर्व जबाबदाऱ्या केवळ एका स्त्रीवर असतात. बहुतेक घरांमध्ये बायकांना घरातील सर्वच कामे करावी लागतात. तर, दुसरीकडे वर्किंग लेडीजच्याबाबतीत असं होत नाही. त्यांना घरासह ऑफिस काम करणं खूप कठीण जातं. अशा परिस्थितीत त्यांची खूप चिडचिडही होते. त्यामुळे अशा स्थितीत पती-पत्नी दोघांनी मिळून घरातील कामं करणं आवश्यक आहे. जेणे करून कोणावरही जास्त कामाचा ताण पडणार नाही.तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांवर खूप प्रेम करू शकता, पण तुम्ही एकमेकांना स्पेस द्यायला हवी. यामुळे तुमच्या नात्यात नेहमी 'आनंद' पहायला मिळेल. जर तुमचा पार्टनर तुमच्या कपड्यांपासून ऑफिसपर्यंत 'हस्तक्षेप' करत असेल, तर तुमच्या दोघांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरुन वाद होणं स्वाभाविक आहे. हे टाळण्यासाठी आपण एकमेकांना समजून घ्यायला हवं.लग्नापूर्वी तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप प्रेम करत होता, पण आता करत नाही, अशी आपल्या मनात शंका येत असेल, तर तुमच्यातील 'गैरसमज' वेळीच दूर करा. लग्नानंतर वाढत्या जबाबदाऱ्या पाहून तुमचा जोडीदार तुमच्याकडून ऑफिस आणि कुटुंब यांच्यात समायोजन करण्याची अपेक्षा करू लागतो. त्यामुळे वाद न करता कुटुंबासह कार्यालयाची जबाबदारी स्वीकारुन नात्यात गोडवा निर्माण करा, त्या जबाबदाऱ्या एकत्ररित्या हाताळा.नातेसंबंधात असतानाही मुलगा आणि मुलगी दुसऱ्या कुणाकडेही आकर्षित होऊ शकतात. नात्यात कितीही प्रेम असलं, तरी दुसरा व्यक्ती त्यांना आकर्षित वाटू लागतो. पण, हे चुकीचं आहे. दुसरीकडे नातेसंबंध ठेवणं म्हणजे, आपल्या जोडीदाराची एकप्रकारे फसवणूकच आहे. अशा कारणांमुळे बरीच नाती आपल्याला तुटलेली पहायला मिळतील. त्यामुळे नात्यात एकमेकांवर विश्वास ठेवणं हेच महत्वाचं आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.