नागपूर : सध्या कमी वयातच पुरुषांचे केस विरळ होऊ लागल्याचे पहायला मिळत आहे. केस गळतीचे प्रमाण जास्त असेल तर कमी वयातच टक्कल पडू लागते. धकाधकीची जीवनशैली, वाढते प्रदूषण याबाबी केस विरळ होण्यास कारणीभूत ठरू शकतात. टक्कल पडण्यास सुरुवात झाल्यानंतर वारेमाप प्रसाधने वापरली जातात. यामुळे समस्येत भर पडू शकते. चला तर जाणून घेऊया याविषयी...
बरेचजण रोज केस धुतात पण योग्यप्रकारे वाळवत नाहीत. केस ओले असताना विंचरले तर लवकर तुटतात. त्यामुळे ते काळजीपूर्वक हाताळणे गरजेचं आहे.केस खूप जोरात पुसण्यापेक्षा आधी टिपून घेऊन मग हलक्या हाताने पुसा.धुताना खूप गरम पाणी केसांवर घेऊ नका. अतीगरम पाण्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो.केसांवर कोणत्याही केमिकलचा वापर करण्यापूर्वी हेअर स्टायलिस्टचा सल्ला घ्या.शँपू आणि कंडिशनर वापरण्याआधी त्यामधील रासायनिक घटकांचे प्रमाण तपासून बघा.ओल्या केसांमधून कंगवा फिरवणे केसांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारे असते. यावर पर्याय नसेल तर मोठ्या दातांच्या कंगव्याने हलक्या हाताने विंचरा.उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी वापरली जाते. परंतु, टोपी जास्त घट्ट असेल तर टक्कल पडण्याची शक्यता अधिक असते.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.