hanumanche janmasthan anjaneri fort
हनुमान जन्मस्थळावरून सध्या नाशिक जिल्ह्यात वाद सुरू आहेत. हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी आहे की किष्किंधा आहे यावरून हा वाद सुरू आहे. किष्किंधा येथील मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाचे जन्मस्थळ किष्किंधा येथे असल्याचा दावा केला होता. पण त्यांना त्र्यंबकेश्वर येथील ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे.(hanumanche janmasthan anjaneri fort)
नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा देखील एक महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.अंजनेरीपासून त्र्यंबकेश्वर ६.४ किमी लांब आहे. अंजनेरीची टेकडी सपाट माथ्याची आहे. तिला तीन शिखरे असल्यामुळे ‘त्रिकूट’ म्हणतात. वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे. यादवकालात अंजनेरी भरभराटलेली नगरी होती. त्या काळी तेथे जैनांची मोठी वस्ती होती. ११४१ मध्ये बांधलेले चंद्रप्रभ तीर्थंकराचे मंदिर, मठ व धर्मशाळा येथे आढळतात. एका जैन देवालयात ११४२ चा संस्कृत शिलालेख असून त्यात यादव राजपूत्र सेउणचंद्र याचा उल्लेख आहे. ब्राह्मणी वास्तुकलेचे नमुनेही येथे भरपूर असून गणपतीची मूर्ती व शिवलिंग आढळते.राघोबादादा उन्हाळ्यात येथे राहत असत. त्या वेळी त्यांच्यासाठी बांधलेले ध्यानमंदीर, तलाव, बाह्मणतळे ही टाकी व फैलखाना येथे असून इंग्रजांनीही हे हवा खाण्याचे ठिकाण बनविले होते.१,३०९ मी. उंच असलेल्या या ठिकाणी नाशिकहून आजही लोक हवा खाण्यास जातात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.