belgaum esakal
फोटोग्राफी

PHOTO - बळीराजाच्या पदरी सुख कधी? पावसामुळं भात पिक पाण्याखाली

प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

मिलिंद देसाई

गेल्या दोन तीन दिवसांपासून हलशी आणि परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.

खानापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने भात पिक घेतात. दिवाळीनंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात कापणीचे काम वेगाने हाती घेतले होते. काही दिवस ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला अधिक दिवसांचा विलंब होऊ नये, याकरिता कापणीचे काम सुरू केले.
मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात पिकांमध्ये पाणी साचून राहिले आहे. काही ठिकाणी भात वाहून गेले आहे. भात पिकावर अनेक शेतकऱ्यांचे वार्षिक बजेट ठरत असते.
भात पिक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली असून लवकर पाऊस कमी व्हावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई न दिल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे याची दखल सरकारने घ्यावी असे मत व्यक्त होऊ लागले आहे.
भात पीक कापणीचे काम जोरात सुरू असतानाच पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भात पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागेल याची दखल सरकारने घेतली पाहिजे. - रणजित पाटील, ग्राम पंचायत सदस्य
पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात आली तर समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. - धनंजय पाटील, अध्यक्ष खानापूर तालुका युवा समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT