उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. वाढत्या तापमानाचा त्रास सर्वांनाच होतो आहे. पण उन वाढल्यावर जास्त त्रास रक्तदाब असलेल्या लोकांना होतो. ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, त्यांना डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते, कडक सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे त्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी काही फळं खाल्ल्यास त्यांना उन्हाळ्याचा त्रास कमी होईल आणि त्यांचे बीपीही नियंत्रणात राहील
केळं- रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी तुम्ही केळं खाऊ शकतात. केळ्यात सोडियमचे प्रमाण कमी असते. तर पोटेशिअम जास्त असते. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी नाश्यात केळं खाल्ल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहील. सफरचंद- एक सफरचंद खाल्ल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. सफरचंदात फायबर चांगल्या प्रमाणात असते. तर, कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते.जांभुळ- रक्तदाबाचा त्रास असलेल्या रूग्णांना अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असलेल्या जांभूळ खाल्ल्यामुळे फायदा होऊ शकतो. जांभळामध्ये असलेले अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट रक्तातील नायट्रिक ऑक्साइडची पातळी वाढवते. त्यामुळे जांभूळ खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो.
आवळ्याचा फायदा- औषधी गुणांनी समृद्ध असलेला आवळ्याचा रस रक्तदाब कंट्रोल करण्यासाठी फायद्याचा असतो. त्यासाठी रोज एक चमचा आवळ्याचा रस, १ चमचा मध एकत्र करून दिवसातून दोन वेळा खा. असे केल्याने नक्की फायदा होईल. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.