Funding esakal
जळगाव

Jalgaon News : मार्चमधील पावसाची 20 कोटींची नुकसानभरपाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्यात मार्च महिन्यात विविध जिल्ह्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिके व इतर नुकसानभरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी, ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील १८ हजार ३६४ शेतकऱ्यांना २० कोटी, ४२ लाख, ६१ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. (18 thousand 364 farmers will get compensation of 20 crores jalgaon news)

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी (ता. १०) निधी वितरणाचा शासन निर्णयही काढण्यात आला.

४ ते ८ मार्च व १६ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून, पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्रासाठी विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मार्चमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या पिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार सोमवारी राज्य शासनाकडून १७७ कोटी, ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला.

महसूली विभागनिहाय वितरित करण्यात आलेला निधी असा : अमरावती विभाग- २४ कोटी ५७ लाख ९५ हजार रुपये, नाशिक विभाग- ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, पुणे विभाग- पाच कोटी ३७ लाख ७० हजार, छत्रपती संभाजीनगर- ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपये. एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT