Banana
Banana sakal
जळगाव

केळीला आता फळाचा दर्जा

सकाळ वृत्तसेवा

केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत होती.

जळगाव : केळी पिकाला फळाचा दर्जा देण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाच्या फळबाग लागवड योजनेत केळीला फळाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील तरतुदीमध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत फळ लागवड योजनेत केळी, द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, अव्हॅकॅडो आदींचा समावेश केला आहे. विशेष बाब म्हणून या योजनेत यंदा केळीचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेला आहे.

या संदर्भात पाटील यांनी गेल्या आठवड्यातच रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेऊन केळीला फळाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. हा निर्णय जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी क्रांतिकारी आहे. जळगाव जिल्हा केळीचे आगार मानले जात असला तरी केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत होती. याचा सर्वात मोठा फटका हा फळपीक विम्यात बसत असून यामुळे प्रक्रिया उद्योगात केळी उत्पादकांना विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री पाटील केळीला फळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते.

फळ लागवड योजनेतील पिके

केळी, द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, अव्हॅकॅडो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT