cotton seeds
cotton seeds esakal
जळगाव

BTची साडेपाच लाख पाकिटे बाजारात; यंदा कपाशीचा पेरा 20 टक्के वाढणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात आजपासून बी. टी. बियाणांची विक्री होणार आहे. जिल्ह्यासाठी साडेपाच लाख बी. टी. बियाणे पाकिटे उपलब्ध करण्यात आली आहेत. यंदा कपाशीचा पेरा २० टक्के वाढणार असून, साडेपाच लाख हेक्टरपेक्षा अधिक हेक्टरवर कपाशीचा पेरा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गतवर्षी (२०२१) पाऊस चांगला होता. पेराही चांगला झाला. मात्र अतिवृष्टीने कपाशीचे मोठे नुकसान केले. यामुळे कपाशीचे उत्पन्न कमी झाले. मात्र दर नऊ ते तेरा हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला. यामुळे यंदाही कपाशीला चांगली मागणी असेल, यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा अधिक लावण्याचा निर्णय घेतला आहे. गुलाबी बोंडअळीचा धोका कपाशीला होवू नये, यासाठी राज्य शासनाने एक जूनपासूनच बी. टी. बियाण्यांची विक्रीचे आदेश दिले होते. दरवर्षी बागायतदार शेतकरी मेतच कपाशी पेरतात. मात्र त्यावर बोंडअळी येते. ती इतरांच्या कपाशीलाही खराब करते. यामुळे उशिराने पेरा केल्यास बोंडअळीला पोषक वातावरण तयार होणार नाही. बोंडअळीच तयार होणार नसल्याने कपाशीचे बोंडअळीपासून होणारे नुकसान टळेल, या आशेने जून महिन्यातच बी. टी. ची विक्री व पेरणी करा अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

१६ भरारी पथके

जिल्ह्यातील बियाणे खते व कीटकनाशके उत्पादन स्थळ, साठवणूक स्थळ तपासणी, जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील उत्पादकांचे साठवणूक स्थळ तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

''शेतकऱ्यांनी ‘एक गाव एक वाण’अंतर्गत एकजीनसी व स्वच्छ कापूस उत्पादन अभियानात सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी बियाणे खरेदीचे पक्के बील घ्यावे. बिल हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे. एकाच पिकावर विसंबून न राहता मुख्य पिकाबरोबर आतंरपीक व मिस्त्रपिक घ्यावे. बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रीया करुनच पेरणी करावी.'' - गुलाबराव पाटील, पालकमंत्री.

''जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी यावर्षी मका पीकाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन, तृणधान्य व गळीतधान्याचे क्षेत्र वाढणार आहे. जिल्ह्यात २७ लाख ५० हजार पाकिटे कपाशी बियाण्यांचे नियोजन आहे. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ४८२ मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात.'' - संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT