Jalgaon District Collector Aman Mittal esakal
जळगाव

Jalgaon News | ‘अमृत’चे कनेक्शन दिलेल्या तारखेत पूर्ण करा : जिल्हाधिकाऱ्यांची मक्तेदारांना तंबी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर महापालिका नळकनेक्शनसाठी रस्ते खोदकाम करते, अशी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘अमृत’चे मक्तेदार व महापालिका अधिकाऱ्यांना थेट तंबी दिली आहे.

कामे पूर्ण होण्याच्या तारखा त्यांनी घेतल्या आहेत. त्याच वेळेत ही पूर्ण कामे पूर्ण करा, असे कळविले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. (Complete connection of Amrit within given date warning of Collectors to Monopolists Jalgaon News)

जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाने ४२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून १५ रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेने एनओसी दिली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने मक्तेदारांच्या माध्यमातून कामे सुरू केली आहेत. मात्र, शहरातील काही रस्त्यांच्या कामाला अद्यापही विलंब लागत आहे.

त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या रस्त्याच्या कामांना विलंब का होत आहे? याबाबत थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की आम्ही रस्त्यांची कामे त्वरित सुरू करावीत, यासाठी मक्तेदारांना आदेश दिले आहेत.

मात्र, रस्त्यांची कामे मक्तेदारांनी सुरू केल्यास महापालिका त्या भागात रस्ते खोदून नळकनेक्शनची कामे करीत आहेत. बोहरा मशीद, शिवकॉलनी या भागांतही रस्ते खोदण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आम्हाला अडचणी येत आहे. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ते कळविले आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

‘अमृत’ मक्तेदार, मनपाला आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीची जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दखल घेतली आहे. त्यांनी ‘अमृत’ योजनेचे मक्तेदार, महापालिका अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मक्तेदारांना पाचारण केले व ‘अमृत’ योजनेच्या मक्तेदाराकडून कोणत्या रस्त्यावर नळकनेक्शनचे काम सुरू आहे, ते केव्हा पूर्ण होईल, याच्या तारखा घेतल्या, तसेच त्यांना त्याच तारखेच्या वेळेत ते काम पूर्ण करा, असे आदेश दिले आहेत.

यापुढे रस्त्याचे काम झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत रस्ते खोदू नका, असा इशाराही श्री. मित्तल यांनी दिला आहे. रस्ते बांधकाम मक्तेदारांनीही रस्त्याचे कामे वेळेत पूर्ण करावीत. यापुढे कोणत्याही सबबी चालणार नाहीत, अशी तंबी दिल्याचेही सांगण्यात येत आहे.

"शासनाच्या ४२ कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापालिकेकडून येत असलेल्या अडचणी आम्ही कळविल्या होत्या. ज्या ठिकाणी नळकनेक्शनची कामे झाली आहेत, तेथील रस्त्यांची कामे लवकर करण्याचा प्रयत्न असेल."

-गिरीश सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT