SYSTEM
SYSTEM
जळगाव

नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करा : खासदार रक्षा खडसे

सकाळ वृत्तसेवा

यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील शेतकऱ्यांची संकटाची मालिका थांबता थांबेना. तालुक्यात मंगळवारी (ता.३१) सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे २४७ हेक्टर क्षेत्रावर सुमारे साडेनऊ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित नुकसानग्रस्त गावांतील पंचनामे युद्धपातळीवर सुरू झाले आहेत.

दरम्यान, तालुक्यात नुकसान झालेल्या यावल, चुंचाळे, मोहराळे, सौखेडासीम, चिंचोली, हिंगोणा, किनगाव, बोरखेडा आदी गावांना खासदार रक्षा खडसे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी आज भेटी देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांचे सांत्वन केले. शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीला नुकसान झाल्याबाबत कळविण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच महसूल व कृषी विभागाने पंचनाम्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना देखील त्यांनी केल्या.

तालुक्यात यावल, भालोद, फैजपूर, साकळी व किनगाव या पाच महसूल मंडळात ३३ गावांत ३०४ शेतकऱ्यांचे २४७ हेक्‍टर क्षेत्रावर केळी पिकाचे सुमारे साडेनऊ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे बहुतेक शेतकरी हतबल झाले आहेत. यात सर्वाधिक नुकसान साकळी महसूल मंडळात नऊ गावांचे ८४ शेतकऱ्यांचे ७६ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. त्या खालोखाल किनगाव महसूल मंडळात नऊ गावांमध्ये ६३ शेतकऱ्यांचे ५४ हेक्टर क्षेत्रात, यावल महसूल मंडळात सहा गावांमध्ये ५९ शेतकऱ्यांचे ४६ हेक्टर क्षेत्रात, फैजपूर महसूल मंडळात ६ गावात ४६ शेतकऱ्यांचे २८.५० हेक्‍टर क्षेत्रात, तर भालोद महसूल मंडळात ३ गावात ५२ शेतकऱ्यांचे ४२.५० हेक्‍टर क्षेत्रात केळी पिकाचे नुकसान झाले आहे. सर्व नुकसान ३३ टक्क्यांवरील नुकसान आहे. महसूल व कृषी विभागाचे संयुक्त पथक नुकसानग्रस्त भागात पंचनाम्यांसाठी युद्धपातळीवर कार्यरत झाले आहे.

दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी गुरूवारी तालुक्यात नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा केला. या वेळी त्यांच्या समवेत तहसीलदार महेश पवार, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे, कृषिमंडळ अधिकारी अजय खैरनार, भाजपचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, कृषिभूषण नारायण चौधरी, माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, माजी जिल्हापरिषद सदस्य सविता भालेराव, हर्षल पाटील, भरत महाजन, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत आदी उपस्थित होते. खासदार रक्षा खडसे यांनी महसूलसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे पूर्ण करण्याचे काम तातडीने करावे, अशा सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी विमा कंपनीला ७२ तासांच्या आत कळविणे विषयीचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT