जळगाव

तब्बल.. सात दिवसांनी जळगावला झाला लसींचा पुरवठा

भूषण श्रीखंडे

जळगाव ः जिल्ह्यात अखेर तब्बल सात दिवसांनी कोरोना लसींचा पुरवठा झाला आहे. आज सकाळीच ४० हजार २०० लसी उपलब्ध झाल्याने शहरातील बहुतांश सर्वच लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातही उद्यापर्यंत (ता.१४) लस पोचणार असल्याने ग्रामीण भागातील लसीकरण उद्यापासून सूरू होणार आहे.

गेल्या बुधवारपासून जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद आहेत. जी सुरू होती ती को-वॅक्सीन लसीची होती.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ एप्रिलपासून ते १४ एप्रिलपर्यंत टीका महोत्सवाची (लसीकरण) घोषणा केली आहे. जळगाव जिल्ह्यात लस उपलब्ध नसलयाने टीका महोत्सवाचा फज्जाच उडाला होता.

लसीकरण केंद्र होती बंद

शहरात गेल्या बुधवारीपासून सर्वच लसीकरण केंद्रे बंद होती. या मुळे नागरिकांना लसींसाठी भटकंती करावी लागली. मात्र लस उपलब्ध झाल्या नसल्याचे सांगण्यात आले होते. जिल्ह्यात लसच नसेल, तर आरेाग्य विभाग टीका महोत्सव कसा साजरा करणार असा प्रश्‍न आरेाग्य विभागाला निर्माण झाला होता. लसींचा तुटवडा भासत असल्याने आरोग्य विभागही हतबल झाला होता.

सात दिवसांनातर मिळाल्या लसी

अखेर आज ४० हजार २०० जिल्ह्यात कोव्हिशील्ड लसींचे डोस आलेले आहेत. यामुळे शहरातील रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगर रुग्णालय व खासगी ठिकाणी लसीकरण सुरू झालेले आहे. जिल्ह्यासाठी आणखी एक लाख लसी मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT