जि. प.  sakal
जळगाव

जळगाव : करवसुली आकड्यांमध्‍ये गोलमाल

जि. प.सर्वसाधारण सभेत गदारोळ; वार्षिक अहवाल नामंजूर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ग्रामपंचायतींकडून करवसुली केली जाते. वार्षिक अहवालात याची ८० टक्‍के वसुली दाखविण्यात आली आहे. असे असेल तर ग्रामपंचायतींकडून जिल्‍हा परिषदेचे ३० कोटी रुपये घेणे असताना रक्‍कम जमा का केली जात नाही. अर्थात, वार्षिक अहवालात दाखविलेली वसुलीची आकडेवारी खोटी दाखवून सभागृहाची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला. यावरून सभागृहात ठेवण्यात आलेला वार्षिक अहवाल नामंजूर करण्यात आला.

जिल्‍हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. १४) अध्‍यक्षा रंजना पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. सभेला मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उपाध्‍यक्ष लालचंद पाटील, सभापती ज्‍योती पाटील, जयपाल बोदडे, रवींद्र पाटील, उज्ज्‍वला माळके, अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी डी. आर. लोखंडे उपस्थित होते.

बीडीओंना वसुलीचे टार्गेट द्यावे

करवसुलीचा मुद्दा शिवसेनेचे नाना महाजन यांनी सभागृहात मांडला. यात जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींची वसुली ८० टक्‍के असल्‍याचे वार्षिक अहवालात दाखविले आहे. या आकडेवारीनुसार जनता कर भरत असेल, तर ५५० ग्रामपंचायतींचे कनेक्‍शन कट का झाले? असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला. तसेच वसुली झाली असेल, तर ती रक्‍कम जिल्‍हा परिषदेकडे भरली का नाही? अर्थात, सभागृहाची दिशाभूल करत अधिकारीच अधिकाऱ्याला वाचविण्याचे काम करत असल्‍याचा आरोप नाना महाजन यांनी केला. यासाठी चौकशी होऊन बीडीओंना टार्गेट देण्यात यावे, अशी मागणी त्‍यांनी केली.

शिखर समिती स्‍थापन व्‍हावी

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत होणाऱ्या पाणीपट्टी वसुलीसाठी शिखर समिती स्‍थापनेबाबतचा मुद्दा सभेत मांडण्यात आला. यात कासोदा येथे शिखर समिती स्‍थापन करण्यात आली, तर जिल्‍ह्यात अन्‍य ठिकाणी समिती का नाही? असा प्रश्‍न मांडण्यात आला. या विषयावरून सभागृहात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. यामुळे सर्वच योजनांवरील पाणीपट्टी वसुलीसाठी शिखर समिती स्‍थापन व्‍हावी; अशी मागणी करत सदर विषय नामंजूर करण्यात आला.

शेतकरी मदतीवरून गदारोळ

अतिवृष्‍टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजाला मदत म्‍हणून राज्‍य सरकारने मदत जाहीर केली आहे. याबाबत नाना महाजन यांनी शासनाचा अभिनंदन ठराव मांडला. यावर भाजपचे पोपट भोळे यांनी आक्षेप मांडत शासनाने दिलेली मदत तुटपुंजी असल्‍याचे म्‍हटले. अतिवृष्‍टीमुळे जमिनी खरडून गेल्‍या आहेत. त्‍याचा मोबदला शेतकऱ्याला मिळावा; अशी मागणी पोपट भोळे यांनी केली. मात्र महाविकास आघाडीचे चांगले काम असून, शेतकऱ्यांच्या विषयात राजकारण नको, असे शिवसेनेचे रावसाहेब पाटील यांनी सत्ताधारी भाजपला उद्देशून म्‍हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: निवडणुकीआधी काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; बेस्टच्या कायापालटासाठी मांडली ठोस योजना

Nashik Cyber Fraud : सावधान नाशिककर! वर्षभरात सायबर भामट्यांनी मारला ५७ कोटींवर डल्ला; शेअर मार्केटच्या नावाने सर्वाधिक लूट

UPI Payment Tips : UPI पेमेंट करताना सावध! या सुरक्षा टिप्स दुर्लक्ष केल्यास खातं होऊ शकतं रिकामं!

Blue Drum : चर्चेतील मेरठ हत्याप्रकरणावर आधारित डॉक्यू-सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Motorola Viral News : मोटोरोला मोबाईल ब्लास्टवर कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT