जळगाव

शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान ८३ टक्के मिळाले 

देविदास वाणी

जळगाव ः गेल्या खरीप हंगामात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीच्या नुकसान झाले होते. राज्य शासनाकडून या नुकसानीपोटी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १९ कोटी ५५ लाख तर दुसऱ्या टप्प्यात देखील १९ कोटींच्यावर अनुदान राज्य आपत्ती निधीअंतर्गत प्राप्त झाले होते. पहिल्या टप्प्याचे ९२ टक्के वाटप झाले. दुसऱ्या टप्प्याचे देखील वितरण ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आचार संहितेमुळे लांबले होते. या दुसऱ्या टप्प्याचे लाभ अजूनही अनेक शेतकरी लाभार्थ्यांना झालेला नाही. हे वितरण आतापर्यत केवळ ८३ टक्के झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 

गतवर्षी (२०२०) च्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत अतीपाउस तसेच वादळ वाऱ्यांमुळे तर काही ठिकाणी पुरामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात पंचनामे व नुकसानीच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत ३७ कोटी ६० लाख १८हजार रुपये दोन टप्पे जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. यात ५४ हजार ८०२ शेतकऱ्यांसाठी ३१ कोटी ३८ लाख ३८ हजार ५ रूपयांच्या मदतीचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. या मदत वाटपाचे प्रमाण सुमारे ८३.४६ टक्के असून उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत वर्ग करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT