जळगाव

शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान ८३ टक्के मिळाले 

देविदास वाणी

जळगाव ः गेल्या खरीप हंगामात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीच्या नुकसान झाले होते. राज्य शासनाकडून या नुकसानीपोटी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १९ कोटी ५५ लाख तर दुसऱ्या टप्प्यात देखील १९ कोटींच्यावर अनुदान राज्य आपत्ती निधीअंतर्गत प्राप्त झाले होते. पहिल्या टप्प्याचे ९२ टक्के वाटप झाले. दुसऱ्या टप्प्याचे देखील वितरण ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आचार संहितेमुळे लांबले होते. या दुसऱ्या टप्प्याचे लाभ अजूनही अनेक शेतकरी लाभार्थ्यांना झालेला नाही. हे वितरण आतापर्यत केवळ ८३ टक्के झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 

गतवर्षी (२०२०) च्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत अतीपाउस तसेच वादळ वाऱ्यांमुळे तर काही ठिकाणी पुरामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात पंचनामे व नुकसानीच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत ३७ कोटी ६० लाख १८हजार रुपये दोन टप्पे जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. यात ५४ हजार ८०२ शेतकऱ्यांसाठी ३१ कोटी ३८ लाख ३८ हजार ५ रूपयांच्या मदतीचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. या मदत वाटपाचे प्रमाण सुमारे ८३.४६ टक्के असून उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत वर्ग करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral

Latest Marathi News Live Update: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज दिल्लीत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली

Baramati Politics:'बारामतीत राष्ट्रवादी व भाजपचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप'; उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाचे उमटले राजकीय पडसाद..

Google Search : रात्रीच्या वेळेस पुरुष गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने दुनिया हादरली

Raju Shetti: शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अटापिटा: राजू शेट्टींचा आरोप; टेंडरसाठी बड्या कंपन्यांकडून घेतला ॲडव्हान्स ?

SCROLL FOR NEXT