Farmer's suicide esakal
जळगाव

शेतीत नुकसान अन् बॅंकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

खिर्डी (जि. जळगाव) : रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली. भामलवाडी येथील रहिवासी विजय भाऊराव पाटील (४०, उर्फ श्रीराम पाटील) या शेतकऱ्यांने उष्णतेमुळे केळीचे झालेले नुकसान व फायनान्स व बँकेच्या कर्जाला कंटाळून गोठ्यातील छ्ताला दोरीच्या साहाय्याने दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची प्राथमिक माहिती गावचे पोलिस पाटील प्रमोद पाटील यांनी निभोंरा पोलिस स्टेशन येथे दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT