जळगाव

निवडणूकीबाबत एका गावाचा आहे विक्रम ! कोणता जाणायचायं तर मग वाचा  

आल्हाद जोशी

एरंडोल : ग्रामपंचायत निवडणुकीत एरंडोल तालुक्यातील एका गावाचा अनोखा विक्रम केला आहे. गेल्या पन्नास वर्षापासून ग्रामपंचायतसह विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे.माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत व विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली आहे.

तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे.आमदार चिमणराव पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास 21 लाख रुपये विकासनिधीच्या माध्यमातून देण्याचे जाहीर केले होते. तालुक्यातील धारागीर,सोनबर्डी व हनुमंतखेडे या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता आहे. माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या धारागीर गावात 1970 पासून म्हणजे सुमारे पन्नास वर्षापासून ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध केली जात आहे.

प्रत्येक समाजाला संधी

पन्नास वर्षापासून गावातील प्रत्येक निवडणूक बिनविरोध करून धारागीर ग्रामस्थांनी राज्यात आदर्श निर्माण केला आहे.धारागीर गावातील ग्रामस्थ प्रत्येक निवडणूक माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध करीत आहेत.धारागीर गावात राजपूत,मराठा,दलित,अदिवासी समाजाचे नागरिक राहत असून माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.गावात कोणताही वाद झाल्यास ग्रामस्थ एकत्र बसुन वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असतात.प्रत्येक निवडणुकीत ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करून उमेदवार निच्छित करीत असतात.

गावाचे पूनर्वसन 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देखील सर्व मतदार माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मतदान करीत असतात.तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या अनजानी प्रकल्पात जुने धारागीर बुडीत झाले असून राष्ट्रीय महामार्गावर नवीन गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे.गावातील लोकसंख्येपेक्षा जास्त झाडांची लागवड करून त्यांचे ग्रामस्थांनी संगोपन करून वृक्षारोपणाचा आदर्श निर्माण केला आहे.माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी लढवलेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थ खंबीरपणे त्यांच्याबरोबर राहिले असल्याचा इतिहास आहे.बिनविरोध निवड झालेले सर्व सदस्य गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात.

पन्नास वर्षाची परंपरा

ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे पन्नास वर्षापासून ग्रामपंचायत व विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध केली जाते.निवडणूक बिनविरोध होत असल्यामुळे गावात कोणतेही राजकीय वाद होत नाहीत.सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन उमेदवारांची निवड केली जाते.सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न पन्नास वर्षात करण्यात आला आहे.निवडणूक बिनविरोध होत असल्यामुळे गावाचा विकास होत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

Nashik News : एकाचवेळी जीएसटी, आयटीआर आणि ऑडिट: करदात्यांसमोर मोठे संकट

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

पोलिसांचा धक्कादायक कारनामा समोर; ट्रक थांबवण्यासाठी केली दगडफेक; नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT