

Maharashtra Weather
ESakal
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या संततधार कोसळत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशातच हा पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून अलर्ट जारी केला आहे.