money returne esakal
जळगाव

Jalgaon News : ‘Phone Pe’वर आलेले 10 हजार केले परत; हरिश्चंद्र तावडे यांचा प्रामाणिकपणा!

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : अलीकडच्या स्वार्थी व स्वयंकेंद्री युगात माणुसकी व प्रामाणिकपणा लोप पावत असल्याचा आरोपात्मक सूर समाज मनातून व्यक्त होत असल्याचे आपण पाहतो. परंतु अजूनही समाजात प्रामाणिकपणा शिल्लक आहे, याची प्रचिती देखील विविध घटनांवरून येते. (Harishchandra Tawde returned 10 thousand rupees received on phonepe to concerned person jalgaon news)

कळमसरा (ता. पाचोरा) येथील हरिश्चंद्र दत्तात्रय तावडे यांनी देखील आपला प्रामाणिकपणा कायम राखत ‘फोन पे’वर आलेले दहा हजार रुपये संबंधित व्यक्तीस परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

हरिश्चंद्र तावडे यांना ‘फोन पे’वर दहा हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले. कोणीही कोणत्याही कारणाने आपल्या ‘फोन पे’द्वारे पैसा पाठवणार नसल्याचे त्यांना ठाऊक असल्याने त्यांनी कोणाच्या ‘फोन पे’वरून ही रक्कम आली. त्याचा शोध घेतला व पैसे पाठवणाऱ्यांशी संपर्क केला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

कुणाल पवार (रा. टाकळी, ता. चाळीसगाव) यांनी पैसे पाठवल्याचे सिद्ध झाल्यावर त्यांनी त्याबाबत विचारणा केली असता श्री. पवार यांना दुसऱ्या क्रमांकावर पैसे पाठवायचे होते परंतु मोबाईल क्रमांक डायल करताना एक क्रमांक चुकीचा डायल झाल्याने ते पैसे श्री. तावडे यांच्या मोबाईलवर जमा झाल्याचे स्पष्ट झाले. श्री. तावडे यांनी सदर व्यक्ती तीच असल्याची खात्री करून त्यांच्याच मोबाईल क्रमांकावर ‘फोन पे’द्वारे दहा हजार रुपये परत पाठवले. त्यांच्या प्रामाणिक वृत्तीचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT