farmer Sowing esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : शंभर मिमी पाऊस पडल्यावरच पेरणी करा; कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला

Jalgaon Agriculture : काही वर्षांपासून मॉन्सूनचे आगमन उशीरा होत आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्याही उशिराने होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनचे आगमन उशीरा होत आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्याही उशिराने होत आहेत. त्याचाच परिणाम हंगामाच्या उत्पादनादेखील झालेला पाहावयास मिळाला आहे. यावर्षी मात्र, मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरिप हंगामातील पेरणीला लवकर वेग येण्याची शक्यता आहे. ( Sow only after 100 mm of rain advice of agriculture officials )

मात्र, शेतकऱ्यांनी शंभर मिमी पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी, असा सल्ला भुसावळचे तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी दिला आहे. साधारणपणे एक जून ते ३० सप्टेंबर हा मॉन्सूनचा कालावधी समजला जातो. यंदा मॉन्सूनचे लवकर आगमन व सरासरी १०६ मिमी पाऊस होणार असल्याचे भाकीत हवामान विभागाच्या वेधशाळेने वर्तविले होते. त्यानुसार मॉन्सूनचे आगमन झालेही. मृगाच्या पूर्वसंध्येलाच पावसाच्या सरी कोसळल्या.

मात्र, हा पाऊस मॉन्सूनचा की वाळवीचा, याबाबत अजूनही अनेकांत साशंकता आहे. सहा जूनच्या आधीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून ढग दाटून येत आहेत. तूरळक पाऊसदेखील होत आहे. वातावरणातील आर्द्रतेचा टक्कासुद्धा वाढत आहे. त्यामुळे जोरदार पावसाचे संकेत दिसत आहेत. भुसावळ तालुक्यात पाऊस जरी चांगला होत असला तरी एवढ्या पावसाच्या भरवशावर खरीप पेरणी करणे चुकीचे ठरेल. (latest marathi news)

त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पेरणीयोग्य पावसाची वाट पाहावी. त्यातही सरासरी १०० मिमी पाऊस होईपर्यंत किंवा जमिनीमध्ये दोन ते तीन फूट खोल ओलावा निर्माण होत नाही, तोपर्यंत पेरणी करण्याची शेतकऱ्यांनी घाई करू नये, असा सल्ला भुसावळ तालुक्याचे कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. कारण

भुसावळ तालुक्यातील बहुतांश भागात पेरणी व लागवडीची लगबगसुद्धा सुरू झालेली दिसत आहे. खते, बी-बियाणे आदी शेतीपयोगी वस्तू खरेदीलादेखील जोर आलेला आहे. म्हणून जमिनीत दोन ते तीन फूट खोल ओलावा निर्माण होत नाही, तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला दिल्याने शेतकऱ्यांनीदेखील आता पावसाची वाट पाहण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

बियाण्यांची निवड जपून करा

पावसाच्या सरी कोसळताच शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदीला सुरुवात केलेली आहे. मात्र, बियाणे खरेदी करताना प्रमाणित, शिफारसीत वाणांची निवड करून नोंदणीकृत केंद्रावरूनच खरेदी करावी. बियाण्यांच्या पिशवीवर मुदत, किंमत व कंपनीची खात्री करावी. बियाणे खरेदी पश्चात विक्रेत्यांकडून पक्के बिल घेणे आवश्यक आहे, अशी माहितीही कृषितज्ज्ञांनी ‘सकाळ’ला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT