Farmers of Javkhede during a sit-in protest at Taluka Agriculture Office on Friday. esakal
जळगाव

Farmer Protest: पंचनामे करूनही अतिवृष्टीग्रस्त वंचितच; जवखेडा येथील शेतकऱ्यांचे अमळनेर तालुका कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन

Farmer Protest: प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचितच असल्याचे विदारक चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : तालुक्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचितच असल्याचे विदारक चित्र आहे. म्हणून येथील तालुका कृषी कार्यालयात तालुक्यातील जवखेडा येथील शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी (ता.४) ठिय्या आंदोलन केले. तालुक्यात जून व जुलै महिन्यांनंतर सप्टेंबरमध्येही सर्वदूर अतिवृष्टीमुळे शेतजमीन व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ( farmers of Jawkheda affected by heavy rains staged protest at Amalner Taluka Agriculture Office )

प्रामुख्याने आर्डी, अनोरे व जवखेडा या भागांतील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाकडून अतिवृष्टीचे पंचनामे करण्यात आलेत मात्र, ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते, त्यांनाच शासनाकडून मदत मिळू शकली नाही. ज्यांचे पंचनामेच करण्यात आले नाहीत, त्यांना मात्र, मदत मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. म्हणून कृषी विभागाने शेतीच्या बांधावर येऊन नुकसानीची प्रत्यक्ष खात्री करावी, अशी मागणीही सर्व शेतकऱ्यांची होती.

कृषी सहाय्यक व तलाठी यांनी शेतकऱ्यांची यादी तयार करायला दिरंगाई केली, तर काहींनी यादीच तयार केली नाही, अशीही तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली. परिसरातील २०० शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आलेत. मात्र, लाभ मिळू शकला नसल्याचे त्यांनी सांगितले. खरोखर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. फक्त जून महिन्यात तालुक्यातील काही मंडळांत १८९ मिमी पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यात जमीन खरडली गेली. काहींच्या शेतीत गाळ साचला, पिकांचे अतोनात नुकसान झाले मात्र, पंचनामे झाले नसल्याचे शेतकरी म्हणत होते. प्रत्यक्ष शेतीत येऊन पंचनामे झाले नाहीत. शेतीपिक कामातून गेलेले असताना ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाचे कर्मचारी सांगत राहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी (ता.४) अमळनेर तालुका कृषी कर्यालयात दिवसभर ठिय्या आंदोलन केले.

कृषी अधिकारी बाहेरगावी!

अमळनेरचे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे हे नाशिक येथे बैठकीला गेलेले होते. दुसरे कार्यालय कृषी अधिकारी अविनाश खैरनार व इतर कृषी सहाय्यक यांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. म्हणून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कृषी कार्यालयात दाखल झाले.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. श्‍याम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या तहसीलदारांसमोर मांडल्या. पुरुषोत्तम पाटील, किरण पाटील, अनिल पाटील, हिंमत पाटील, प्रमोद पाटील, मुरलीधर पाटील, सुरेश पाटील, शरद पाटील, सुनील पाटील, विमल पाटील, संगीता पाटील, निर्मला न्हावी, सुनीता पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

''शेतीपिकांच्या नुकसानीची पुन्हा तपासणी करून कृषी विभागाला याद्या तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्या याद्या शासनाकडे सादर केल्या जातील. कुणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊ.''- रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार, अमळनेर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Ambedkar: पंतप्रधान मोदींचे अमेरिकेच्या दबावात निर्णय: प्रकाश आंबेडकर;संघ मुख्यालयावर मोर्चाची केली घोषणा

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT