jowar esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : ज्वारी हमीभाव खरेदी केंद्रांना मुहूर्त कधी? जिल्ह्यात 5 हजार शेतकऱ्यांची नोंदणी

Agriculture News : खरीप हंगाम सुरू झाला. मात्र, तरीही प्रत्यक्षात हमीभावाने ज्वारी खरेदीचा मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र आहे.

सुधाकर पाटील

Jalgaon Agriculture News : खरीप हंगाम सुरू झाला. मात्र, तरीही प्रत्यक्षात हमीभावाने ज्वारी खरेदीचा मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात चार हजार ९९६ शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी नोंदणी केली. ता. ३० जूनपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे. वीस दिवसांत किती खरेदी होईल, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातो. शुक्रवार (ता. ७)पर्यंत १८ पैकी केवळ दोनच खरेदी केंद्रे सुरू होऊ शकली आहे.

जळगाव जिल्ह्यात हमीभाव केंद्रात ज्वारी खरेदीसाठी नावनोंदणी करण्यात आली. मात्र, पावसाळा सुरू झाला, तरी प्रत्यक्षात खरेदी सुरू व्हायला तयार नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात फक्त पारोळा व शेंदुर्णी येथेच खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र, उर्वरित केंद्रांवर खरेदी सुरू झालेली नाही.

खरेदी केंद्रे कधी सुरू होतील?

जिल्ह्यात एकूण १८ खरेदी केंद्रांवर ज्वारीची नोंदणी करण्यात आली आहे. ३१ मेपर्यंत तब्बल चार हजार ९९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मात्र, शुक्रवारपर्यंत फक्त पारोळा आणि शेंदुर्णी ही दोनच खरेदी केंद्रे सुरू झाली असल्याचे मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. उर्वरित १६ खरेदी केंद्रे केव्हा सुरू होतील, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. याबाबत प्रशासन बिलकुल गंभीर नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खरेदीसाठी ३० जूनपर्यंत मुदत

ज्वारी खरेदीसाठी शासनाकडून फक्त ३० जूनपर्यंत मुदत असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी सांगितले. शनिवार (ता. ८)पर्यंत जिल्ह्यात १८ पैकी फक्त जेमतेम दोन खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. उर्वरित केंद्रे सुरू केव्हा होतील, हे सांगणे अवघड आहे. त्यात जूनमधील दहा दिवस संपले आहेत. (latest marathi news)

त्यामुळे ३० जूनपर्यंत खरेदी कशी काय होईल, हा प्रश्न प्रशासनाने समजून घेणे आवश्यक आहे. अगोदरच ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राची वाट पाहून व्यापाऱ्यांना हजार ते बाराशे रुपये प्रतिक्विंटल कमी दराने ज्वारी विक्री केली आहे. उरलेल्या २० टक्क्यांपेक्षा शेतकऱ्यांचा माल राहिला. मात्र, तोही खरेदी होताना दिसत नाही.

हमीभावाचा फायदा काय?

एकीकडे शासन मोठा गाजावाजा करून हमीभावात वाढ केल्याचे मिरवत असते. मात्र, दुसरीकडे हमीभावात शेतकऱ्यांचा मालच खरेदी करीत नसतील, तर त्या हमीभावाचा काय फायदा, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. कधी गुदाम नाही म्हणून, तर कधी बारदान नाही म्हणून खरेदी होत नाही.

भडगावला गुदाम उपलब्ध नाही. तहसीलदारांनी बाजार समितीकडे गुदामाची मागणी केली आहे. त्यामुळे ते गुदाम उपलब्ध झाल्यावर खरेदी सुरू होऊ शकणार आहे. मुळात शासनाला खरंच शेतकऱ्यांचा माल हमीभावात खरेदी करायचा असतो का, हाच खरा प्रश्न आहे.

''ज्वारी खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याबाबत मी व्यक्तिश: लक्ष घालणार आहे. खरेदीला ३० जूनपर्यंत मुदत असली, तरी मी खरेदीला शासनाकडून मुदतवाढीची मागणी करणार आहे.''- किशोर पाटील आमदार, पाचोरा-भडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT