Anjani Dam  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : अंजनी प्रकल्प, ‘एमआयडीसी’सह प्रत्येकवेळी केवळ आश्वासनेच!

Jalgaon News : एरंडोल तालुक्यातील प्रमुख समस्यांकडे सर्वच उमेदवारांनी दुर्लक्ष केले आहे. वनकोठे येथील वसंत सहकारी साखर कारखाना सुमारे तीस वर्षांपासून बंद आहे.

आल्हाद जोशी

Jalgaon News : एरंडोल विधानसभा मतदारसंघातील बंद पडलेला वसंत सहकारी साखर कारखाना, अंजनी प्रकल्पाच्या वाढीव उंचीमध्ये बुडित होणाऱ्या गावांचे पुनर्वसन, ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले श्रीक्षेत्र पद्मालय, फरकांडे येथील झुलता मनोरा, औद्योगिक वसाहत यांसारख्या समस्या सोडविण्याबाबत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी केवळ आश्वासने देऊन मतदारांची बोळवण केली आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

प्रचारात समस्या सोडविण्याची आश्वासने द्यायची आणि निवडणूक झाली, की त्याकडे दुर्लक्ष करायचे, असा अनुभव तीस वर्षांपासून मतदारांना येत आहे. एरंडोल तालुक्यातील प्रमुख समस्यांकडे सर्वच उमेदवारांनी दुर्लक्ष केले आहे. वनकोठे येथील वसंत सहकारी साखर कारखाना सुमारे तीस वर्षांपासून बंद आहे.

१९९० पासून सर्वच निवडणुकीत उमेदवारांनी तो सुरू करण्याबाबत आश्वासने देऊन सभासद, ऊसउत्पादक शेतकरी, कामगार यांची मते मिळवली, मात्र निवडणुका होताच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. १९९९ मध्ये तत्कालीन आमदार तथा विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वसंत कारखाना आणि अंजनी प्रकल्प या दोन प्रमुख समस्या प्राधान्याने सोडविण्याची घोषणा करून निवडणूक लढवली होती.

मात्र, दहा वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व केल्यानंतरही पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांच्या कारकीर्दीत या दोन्ही समस्या सुटलेल्या नाहीत. अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीनुसार काम पूर्ण झाले आहे. मात्र वाढीव उंचीत बुडित होणाऱ्या तीन गावांचे पुनर्वसन अद्याप न झाल्याने प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करण्यास अडचण निर्माण होत असते. (Latest Marathi News)

पूर्ण क्षमतेने जलसाठा होऊन एरंडोल आणि धरणगाव तालुक्यांतील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. १९९५ ते १९९९ पर्यंत अंजनी प्रकल्पाच्या वाढीव उंचीसह काम पूर्ण झाले आहे. मात्र सुमारे तीस वर्षांचा कालावधी उलटूनही तीनही गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न न सुटल्यामुळे दर वर्षी अंजनी नदीच्या पात्रातून पाणी वाहून जात असते. विकासाचे स्वप्न दाखवून मतदारांची दिशाभूल न करता ते प्रत्यक्षात अमलात आणण्याची राजकीय इच्छाशक्ती उमेदवारांनी दाखवण्याची गरज आहे.

श्रीक्षेत्र पद्मालयचा विकास आवश्‍यक

देशभरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पद्मालयच्या विकासाकडेही सातत्याने दुर्लक्ष होत आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेला एरंडोल तालुका औद्योगिक वसाहतीपासून दूरच आहे. औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून नवीन उद्योगधंदे सुरू झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

१९९१ पासून लोकसभा निवडणुकीत तालुक्यातून भाजपला आघाडी मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होणार असल्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender 2025: हत्तींचं स्थलांतर, बिबट्यांची दहशत अन् कुत्र्यांचा वाद… 'हे' वर्ष वन्यजीवांसाठी इतकं हादरवणारं का ठरलं?

Kolhapur CPR : दोन हजारांत एमआरआय, ३५० रुपयांत सीटीस्कॅन; सीपीआरमधील सुविधेमुळे रुग्णांचा खर्च आणि वेळ वाचला

Year Ender 2025: लोकांनी वजन कमी करण्यापेक्षा हेल्दी राहण्यावर दिला भर; 'हे' ठरले 2025 चे 7 जबरदस्त फिटनेस ट्रेंड्स

Latest Marathi News Live Update: अॅडव्होकेट प्रशांत पाटील यांनी बारामती सत्र न्यायालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने लावली हजेरी

नागराजचं खरं रूप बापूमुळे अखेर अर्जुन सायली समोर येणार ? प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता याचाही खून.."

SCROLL FOR NEXT