fertilizers seeds esakal
जळगाव

Jalgaon News: खते, बियाणे वाजवी दरात न मिळाल्यास लावा फोन! कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन; तक्रार निवारण कक्ष सुरू

Jalgaon News : अधिक दरात विक्री होत असेल, तर शेतकऱ्यांनी तक्रार निवारण कक्षात फोन लावावा, असे अवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : खरीप हंगाम २०२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खत पुरवठा, उपलब्धता, वाजवी दरात विक्रीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आल्या आहेत. तरीही अधिक दरात विक्री होत असेल, तर शेतकऱ्यांनी तक्रार निवारण कक्षात फोन लावावा, असे अवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहेत. (Jalgaon not get fertilizers seeds at reasonable price call)

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री क्रमांकाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

टोल फ्री ७४९८१९२२२१ या क्रमांकावर, तसेच कृषी विभागाच्या ०२५७-२२३९०५४ व ९८३४६८४६२० यापैकी कोणत्याही दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. बियाणे किंवा खते उपलब्ध होत नसल्यास, याबाबत कुठलीही तक्रार असल्यास वरील क्रमांकांवर कॉल करावा. (latest marathi news)

त्या ठिकाणी कंट्रोल रुम तथा नियंत्रण कक्षातून आपणास मार्गदर्शन मिळेल व आपल्या समस्येबाबत संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील, असे कृषी विकास अधिकारी सूरज जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT